Tag Archives: bjp

मराठा आंदोलनाबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सहकार्याची भूमिका घेतलीय मंत्रिमंडळ उपसमिती घेणार निर्णय

गेल्या दहा वर्षांत आमच्या महायुती सरकारच्या कार्यकाळात मराठा समाजाला जितका न्याय मिळाला तो इतर कोणत्याही सरकारच्या कार्यकाळात मिळाला नाही. मराठा समाजाला आरक्षण आम्हीच दिले. मराठा समाजाचे आरक्षण टिकले. आता देखील आम्ही मराठा समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती तयार केली आहे. मराठा समाजाच्या मागण्यांवर त्या मार्फत विचार सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

बिहारमधील मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी तेजस्वी यांच्यासोबत मुख्यमंत्री स्टॅलिनही सहभागी बिहारमधील सहभाग पाहण्यासाठी आलो आहे

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन बुधवारी (२७ ऑगस्ट २०२५) बिहारमधील ‘मतदार अधिकार यात्रे’मध्ये सामील झाले आणि म्हणाले की भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयोगाला ‘कठपुतली’ बनवले आहे. निवडणूक आयोगाच्या कृतीचा निषेध करताना, मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी असे ठामपणे सांगितले की, त्यांनी २००० किमीचा पल्ला पार करून बिहारला भेट दिली, फक्त सर्व लोकांचा सहभाग …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वंदे भारत एक्सप्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार नांदेड - मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ

मराठवाड्याच्या विकासासाठी शासन दळणवळण सुविधांवर भर देत आहे. ‘वंदे भारत एक्सप्रेस’ मुळे नांदेड शहर मुंबईच्या अधिक जवळ आले आहे. यामुळे निश्चितच मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार उघडले आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नांदेड – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ करण्यात आला. या रेल्वे गाडीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातून ऑनलाइन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, मनमाड-इंदूर रेल्वे भूसंपादनासाठी विशेष समिती फेर सर्वेक्षण करण्याचे दिले निर्देश

मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासाठी होणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नसल्याची ग्वाही  देत  यासाठी एक विशेष समिती स्थापन करून पुनःसर्वेक्षण करण्याचे  निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी  दिले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, प्रस्तावित मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग प्रकल्पात ज्या  शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांना योग्य आणि वाढीव मोबदला मिळावा, यासाठी आज …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा टीका,… खरे लायर दिल्लीत तर महाराष्ट्रात थीफ मिनिस्टर सुप्रीम कोर्टाने निर्देश देऊनही अजून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत, आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राहुल गांधी द्वेषाची काविळ झाली असून मोघलांना जसे धनाजी संताजी दिसत होते तसे भाजपा व देवेंद्र फडणवीस यांना दिवसरात्र राहुल गांधीच दिसत आहेत, त्याच भितीपोटी ते दररोज राहुल गांधी यांच्यावर टीका करत असतात. खरे लायर तर दिल्लीत बसले असून महाराष्ट्रात थीफ मिनिस्टर बसले आहेत, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र …

Read More »

सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी रामकृष्ण हरिवाली, मटण खालेलं माझ्या पांडुरंगाला चालत… मी माळ कधी घालत नाही, पण मटण सोडून दिलं तर माळ घालीण

मी रामकृष्ण हरीवाली, पण माळ घालत नाही कारण कधी कधी मटण खाते. खरं बोलते बाई मी काही त्यांच्यासारखं खोटं बोलत नाही. मी मटण खाल्ल तर माझ्या पांडुंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? खरं आहे की नाही ?, आमचे आई-वडील खातात, नवरा खातो, सासू-सासरे खातात आणि आम्ही आमच्या पैशाने खातो बाबा, …

Read More »

आशिष शेलार यांच्या उपस्थितीत महागणेशोत्सव राज्य उत्सवानिमित्त गीत आणि पोर्टलचे लोकार्पण महागणेशोत्सवात सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवावा

सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, या महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र राज्याचा राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे. त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत असणाऱ्या विभागांनी विविध उपक्रम, कार्यक्रम, उत्सव तसेच स्पर्धेचे आयोजन केले आहे. याचाच भाग म्हणून राज्यातील प्रत्येक नागरिकास घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे दर्शन मिळावे, यासाठी ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलची निर्मिती …

Read More »

इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी म्हणाले, …पण लोकशाहीच आव्हानाखाली एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांच्याविरोधात इंडिया आघाडीचे उमेदवार

सत्ताधारी एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांची उमेदवारी भाजपाने जाहिर केल्यानंतर विरोधी पक्ष अर्थात इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी शनिवारी (२३ ऑगस्ट २०२५) देशात “लोकशाहीमध्ये कमतरता” असल्याचे सांगत संविधान “तणावाखाली” असल्याचे मत व्यक्त करत संविधानाचे रक्षण आणि संरक्षण करण्याचे वचन दिले. एका वृतत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत न्यायमूर्ती बी …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा मोदी वर हल्लाबोल, गरम सिंदूरचं आता काय कोल्ड्रिक्सं झालं काय? भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून उद्धव ठाकरे यांची टीका

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानस्थित दहशतवादी तळावर हल्ले करून उद्धवस्त केले. तत्पूर्वी बिहारमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरे शरीर मे खून नही तो गरम सिंदूर बह रहा है असे वक्तव्य करत उपस्थित समुदायाला भावविवश केले. त्यास तीन चार महिनेच उलटून …

Read More »

सचिन सावंत यांची टीका, खड्डे कोण बुजवणार यावरून गोंधळात गोंधळ एमसआरडीसीने मुंबईच्या उड्डाणपुलाची जबाबदारी महानगरपालिकेकडे ढकलली

मुंबईतील उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांमधून मुंबईकरांना होणारा त्रास हा महायुती सरकारच्या धोरण लकव्यातून होत असून निवडणुकीपूर्वी मतदानाचा रतीब मिळवण्यासाठी घेतलेल्या टोलमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना सरकारच्या नाकीनऊ आले आहे हे दिसत येत आहे. कोणतेही आर्थिक नियोजन न करता अविचाराने निवडणुकीपूर्वी लोकांना भुलवण्यासाठी घेतलेले निर्णय आता सरकारला पूर्ण करता येत नसल्याने तिकडमबाजीचा वापर …

Read More »