मुंबई : प्रतिनिधी कंगना राणावतच्या घरावरील कारवाई बेकायदेशीर असल्याचा निर्णय देत उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला जोरदार चपराक लगावली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून सूडबुद्धीने करण्यात आलेल्या कारवाईचा बोलविता धनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच होते, त्यामुळे ‘उखाड दिया’ म्हणणाऱ्यांनाच उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाद्वारे ‘उखाड दिया हैं’ अशी टीका भाजपचे मुंबई प्रभारी व कांदिवली …
Read More »मोदींची नवी घोषणा,” वन नेशन, वन इलेक्शन”…व्हिडिओ पाह्यला विसरू नका संविधान दिनाचे औचित्य साधत पंतप्रधानांची घोषणा
मुंबईः प्रतिनिधी देशात सतत कोणत्या ना कोणत्या भागात निवडणूका सुरु असतात. त्यामुळे सुरु असलेल्या विकास कामांमध्ये अडथळा निर्माण होतो. तसेच नागरिक म्हणून त्याचा त्रास ही होतो. त्यामुळे वन नेशन-वन इलेक्शन अर्थात एक देश एक निवडणूकी संकल्पना राबविण्याचा विचार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर केले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ …
Read More »संजय राऊतांना देवेंद्र फडणवीसांचे प्रति आव्हान ईडीला भाजपा नेत्यांची नावे द्याच
मुंबईः प्रतिनिधी शिवसेना प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईमुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाच्या १२० नेत्यांच्या नावाची यादी आपण देणार असल्याचे जाहीर करत भाजपाला आव्हान दिले. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या आव्हानाची तात्काळ दखल घेत राऊतांनी जाहीर केल्याप्रमाणे नावे द्यावीच असे प्रतिआव्हान देत शिवसेनेवर पलटवार केला. ते …
Read More »ईडी कारवाईवर पवार म्हणाले, विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर सरनाईक कुटुंबियांच्या विरोधात ईडी कारवाईवर पवारांची प्रतिक्रिया
मुंबईः प्रतिनिधी महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर थेट निशाणा साधत म्हणाले की, लोकांच्या प्रश्नाची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याची टीका केली. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळत नाही …
Read More »नावात “जय” आणि “नाथ” असलेल्यांची भाजपाला अॅलर्जी मंत्री धनंजय मुंडेंनी प्रचार सभेत लगावला टोला
परभणी : प्रतिनिधी ज्यांच्या नावात जय, नाथ आहेत अशी माणसे आजकाल भाजपाला चालत नाहीत. त्यामुळे धनंजय, जयसिंग सारखी माणसे तसेच गोपीनाथ, एकनाथ यांच्यातील ‘नाथ’ही चालले नाहीत असा टोला भाजपाला लगावत त्यामुळेच आता त्यांना प्रत्येक निवडणुकीत धडा शिकवला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी …
Read More »महाराष्ट्रात लव्ह जिहाद? भाजपाला पडला आपल्याच नेत्याच्या भाचीच्या लग्नाचा विसर कायद्याच्या मुळ चौकटीला धक्का लावण्याचा प्रयत्न
मुंबई : विशेष प्रतिनिधी देशातील भाजपा शासित उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा आणण्याची घोषणा केल्यानंतर पुरोगामी महाराष्ट्रातही हा कायदा आणण्याची मागणी भाजपाच्या किरीट सोमय्या यांच्यासह करत अन्य नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र या नेत्यांनी लव्ह जिहाद कायद्याची मागणी करताना भाजपामधील एका बड्या नेत्याच्या भाचीने मुस्लिम …
Read More »आता राऊतांचे २० हजार कोटी सवलीतेचे आश्वासन पण केंद्राने पैसे दिल्यानंतर १० ते १२ लाख वीज ग्राहकांचे बिले माफ होणार- ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी लॉकडाऊन काळात आलेली वाढीव वीज बिलांमधून नागरिकांना सवलत देण्याच्या उद्देशाने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी काही दिवसांपासून सवलत देणार असल्याचे सांगितले होते. मात्र दिवाळी होताच बिल भरा सवलत मिळणार नसल्याचे वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली. त्यास ४८ तास उलटून जात नाही तोच पुन्हा राज्यातील वीज ग्राहकांना …
Read More »तीन दिवसांत निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसू आ. भातखळकर यांचे महाविकास आघाडी सरकारला अल्टिमेटम
मुंबई : प्रतिनिधी आपल्या गलथान कारभारामूळे संपूर्ण राज्यातील वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बीले अदा करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने येत्या तीन दिवसांत बीज बिलात सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करू असा अल्टिमेटमच भाजपचे मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. भारतीय जनता …
Read More »वीज सवलतीवरून मनसे, भाजपा, वंचित आक्रमक नागरिकांना वीज बिल न भरण्याचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊन काळातील वाढीव वीज बिलात सवलत देण्याची घोषणा करणारे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या सततच्या घोषणेनंतर अचानक यु टर्न घेत वीज बिलात सवलत देता येणार नसल्याचे सांगत नागरिकांनी वीज बिले भरावीत असे आवाहन केले. त्यामुळे भाजपाचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मनसे नेते बाळा नांदगांवकर आणि …
Read More »महेबूबा मुफ्तींबरोबर सत्ता भोगणा-या भाजपने इतरांना देशभक्ती शिकवू नये सत्ता गेली पण भाजपची खोटारडेपणाची सवय गेली नाही!: बाळासाहेब थोरात
मुंबई : प्रतिनिधी सातत्याने खोटे बोलून जनतेची फसवणूक आणि दिशाभूल करणे ही भाजप नेत्यांची जुनी सवय आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याच सवयीला जागून पत्रकार परिषदेत काश्मीरबद्दल बोलताना पुन्हा एकदा काँग्रेस पक्षावर खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. खोटे बोलण्याच्या आणि जनतेला फसवण्याच्या सवयीमुळे राज्यातील जनतेने भाजपला …
Read More »
Marathi e-Batmya