Tag Archives: election commission of india

निवडणूकीपूर्वी काँग्रेस-महाविकास आघाडीच्या खात्यात पहिला विजय रश्मी शुक्ला केंद्रीय निवडणूक आयोगाचे निवडणूक मुख्याधिकाऱ्यांना आदेश

राज्याचे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निवृत्तीनंतरही दोन वर्षाची सेवावाढ देण्याचा निर्णय राज्यातील महायुती सरकारने अर्थात भाजपाचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर रश्मी शुक्ला यांची पोलिस महाचसंचालक पदावरून उचलबांगडी करण्याची मागणी सातत्याने काँग्रेसने दोन वेळा राज्याचे निवडणूक मुख्याधिकारी आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली. …

Read More »

निवडणूकीच्या खर्चाच्या अनुषंगाने उमेदवारांसाठी आयोगाने दिले हे आदेश विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च हिशोब तपासणीसाठी वेळापत्रक जाहीर

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उमेदवार, प्रतिनिधींनी वेळापत्रकानुसार विहित दिवशी व वेळेला उपस्थित राहण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहिम, वरळी …

Read More »

नाना पटोले यांचे आयोगाला पुन्हा पत्र, पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना का हटवत नाही? झारखंड, पश्चिम बंगाल व महाराष्ट्राला वेगळा कायदा आहे का?

विधानसभेच्या निवडणुका सुरु झाल्या असतानाही निवडणूक आयोगाने अद्याप पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवले नाही. काँग्रेस पक्षाने रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली होती पण त्याकडे आयोगाने दुर्लक्ष केले आहे. पश्चिम बंगाल व झारखंडच्या पोलीस महासंचालकांना हटवण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने केली असता त्यांना तात्काळ बदलण्यात आले पण महाराष्ट्राच्या …

Read More »

महाराष्ट्रातील वयो-मानानुसार मतदार किती माहित आहे का? मग जाणून घ्या राज्यात १८ ते १९ वयोगटातील २२ लाख २२ हजार ७०४ तर वयाची शंभरी पार केलेले ४७ हजार ३९२ मतदार

राज्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १८ ते १९ वयोगटातील एकूण २२ लाख २२ हजार ७०४ तर वयाची शंभर वर्षे पूर्ण झालेले ४७ हजार ३९२ मतदार असल्याची माहिती मुख्य निवडणूक …

Read More »

निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त पैसे, दारू ड्रग्ज व मौल्यवान धातू जप्त

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत १५ ते ३० ऑक्टोबर २०२४ पर्यंत एकूण १८७ कोटी ८८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली …

Read More »

२८८ मतदारसंघासाठी आजपर्यंत १०९०५ उमेदवारांचे अर्ज दाखल ७९९५ उमेदवारांचे १०९०५ नामनिर्देशन पत्र दाखल निवडणूक आयोगाची माहिती

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघासाठी निवडणुकीकरिता आज २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध …

Read More »

इलेक्ट्रॅानिक आणि सोशल मीडियातील जाहिराती प्रमाणित करून घेणे बंधनकारक - जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व २६ विधानसभा मतदारसंघातील व्यक्तींनी अथवा उमेदवारांनी इलेक्ट्रॅानिक आणि सोशल मीडियात प्रसृत करण्यासाठीच्या जाहिराती माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) कडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी व समिती अध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले आहे. विधानसभा सार्वत्रिक …

Read More »

आर्यनलँड निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाचा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी संवाद राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर साधला संवाद

आर्यनलँड देशाच्या निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयातील राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट दिली. यावेळी परिषद सभागृह येथे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याशी त्यांनी संवाद साधला. जगात सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत देशाची ओळख आहे. भारत निवडणूक आयोगाच्या अंतर्गत राज्य निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय राज्यात विधानसभा सार्वत्रिक …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका, पराभव दिसू लागल्याने मविआचे नेते मतदार यादीवर संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांची टीका

महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत आज प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, निवडणूक आयोगाला हाताशी धरून प्रत्येक मतदारसंघातील विशेषतः ज्या ठिकाणी भाजपाचे उमेदवार उभा राहणाऱ्या मतदारसंघातील महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांपैकीची १० हजार मते कमी करायची आणि त्यांची १० हजार बोगस मते त्या मतदार यादीत समाविष्ट करायची असा कट रचलेला आहे. …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, निवडणूक आयोगात फूट पाडून राजकीय लाभ घ्यायचाय फोडा आणि राज्य करा हेच भाजपा, काँग्रेसचे धोरण

फोडा आणि राज्य करा हेच भाजपा, काँग्रेसचे धोरण आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रात भाजपाने सर्वोच्च न्यायालयाचा क्रीमीलेअर आणि अनुसूचित जातींमधील वर्गीकरणाचा चुकीचा निर्णय लागू केला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही एकाच …

Read More »