पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भाची मंगळवारी बीरभूम जिल्ह्यातील तिच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली, असे पोलिसांनी सांगितले. २८ वर्षीय भाची ब्रिस्ती मुखर्जी घटक यांचा मृतदेह सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रामपूरहाट येथील त्यांच्या घरातील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत आढळला. त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर रामपूरहाट पोलीस ठाण्याचे कर्मचारी …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा विशेष अधिकारात निर्णय, पेपर लीक प्रकरणी तरूणांच्या विरोधातील सर्व एफआरआय रद्द पेपर लीक प्रकरणी कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील निदर्शनांशी संबधित सर्व एफआरए रद्द, ५ सप्टेंबरचा मोर्चा मागे
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी राज्यघटनेच्या कलम १४२ अन्वये असलेल्या आपल्या विशेष अधिकारांचा वापर करून, देशभरात ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) नेतृत्वाखालील ‘पेपर लीक’ विरोधी निदर्शनांदरम्यान (२० ते २५ जुलै दरम्यान) झालेल्या घटनांबाबत युवा निदर्शकांविरुद्ध दाखल केलेले सर्व एफआयआर (FIR) रद्द केले. न्यायालयाने स्पष्ट केले की, कोणत्याही राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात याच घटनांशी …
Read More »पुण्यात भाजपा कार्यकारणीची बैठक, पण चर्चा विरोधातील काँग्रेसच्या कामाची मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार, भाजपा कार्यकर्त्यांनी फेक नरेटिव्हविरुद्ध लढण्यास सज्ज व्हावे
काँग्रेसने माओवादापासून स्फूर्ती घेत खोटेनाटे सांगत देशात अराजक माजवण्याचा विडा उचलला आहे. काँग्रेससारख्या विरोधकांकडून फेक नरेटिव्ह पसरवण्याचे उद्योग सुरु आहेत. या विरुद्ध भाजपा कार्यकर्त्यांनी लढण्यासाठी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पुणे येथे केले. भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश २०४७ पर्यंत विकसित भारत …
Read More »आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न जारी पूरस्थितीत महाराष्ट्रातील बाधित नागरिकांची संख्या ४०५
नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक व नागरिकही अडकले आहेत. यातील ६७ जणांचा संपर्क व शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. ३० ऑगस्ट २०२६ पर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील एकूण बाधित नागरिक संख्या ४०५ आहे. यापैकी २६२ नागरिकांना स्वगृही आणण्यासाठी यशस्वी कार्यवाही होत असून उर्वरित ७६ …
Read More »मनुस्मृतीच्या प्रती जाळून भाजपच्या मनुवादी वृत्तीचा मुंबई युवा काँग्रेसकडून तीव्र निषेध काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर ‘शुद्धीकरण’ करणाऱ्या भाजप-आरएसएसच्या जातीयवादी मानसिकतेविरोधात दादर येथे आंदोलन
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हल्द्वानी येथील सभेनंतर सभास्थळाचे ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याच्या घटनेचा मुंबई युवक काँग्रेसने तीव्र निषेध केला. भाजप-आरएसएसच्या कथित जातीयवादी आणि मनुवादी मानसिकतेविरोधात मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली दादर येथील भाजप कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनुस्मृतीच्या प्रती जाळून भाजप-आरएसएसच्या मनुवादी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, ‘छात्रों की गुंज’मुळे भाजपा घाबरली; कौन राहुल? म्हणणाऱ्यांना जळी, स्थळी काष्ठी पाषाणी राहुल गांधींच वंदे मातरमवर बोलण्याचा भाजपाला काय अधिकार? आधी RSS च्या शाखेत ‘वंदे मातरम’ गायला सुरु करा
राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या छात्रों की गुंज अभियानाची प्रचंड धास्ती भारतीय जनता पक्ष व राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली दिसत आहे. छात्रों की गुंज वर प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी मागील १३ वर्षात मोदी व फडणवीस यांनी विद्यार्थ्यांसाठी काय केले, हे जाहीर सांगावे, त्यांच्या सरकारने विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले असते तर दिल्लीत जंतरमंतरसह देशभरात …
Read More »अतुल लोंढे यांचा सवाल, मुंबईत १० टक्के पाणी कपात असताना टँकरला पाणी मिळते कुठून? टँकर लॉबीला कोणाचा आशिर्वाद?
मुंबईतील काही सोसायट्यांना दहा टक्के पाणी कपातीचा फटका बसत आहे आणि या सोसायटीमधील नागरिकांना पाण्याचे टँकर बोलावावे लागतात. एखाद्या भागात विकास झाला नसेल, पाण्याची पाइपलाइन पोहोचली नसेल, पाण्याचे डेडिकेटेड स्त्रोत नसतील, तर टँकरने पाणी पुरवठा करणे हे समजू शकते परंतु पाणी कपात असताना या टँकरला पाणी कोठून मिळते, या टँकर …
Read More »अरविंद केजरीवाल यांची टीका, निवडणूक आयोग एसआयआरच्या माध्यमातून देशाची लोकसंख्या कमी करतेय दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या एसआयआरच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि ‘आप’चे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दिल्लीच्या मतदार यादीच्या मसुद्यातून ४७ लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आल्यानंतर त्यांनी हे विधान केले. मसुदा यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, सुमारे दीड कोटी मतदारांपैकी ४७ …
Read More »जागतिक बँकेच्या लवादाचा निर्णय सिंधू पाणी करार अंमलात राहणार, भारताची स्पष्ट भूमिका पाणीवाटप स्थगित जागतिक बँकेच्या लवाद बेकायदेशीर गठित केल्याची भारताची भूमिका
भारताने सोमवारी जागतिक बँकेने गठित केलेल्या सिंधू पाणी करारासंबंधीच्या लवादाचा निकाल फेटाळून लावला. या संस्थेला “बेकायदेशीरपणे गठित” म्हटले असून, पाणीवाटप करार स्थगित ठेवण्याचा भारताचा निर्णय “कायमस्वरूपी लागू” असल्याचे स्पष्ट केले आहे. सिंधू पाणी करार अंमलात राहील असा निकाल लवादाने दिल्यानंतर आणि भारताला जम्मू आणि काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पाचे काम मर्यादित ठेवण्यास …
Read More »नेपाळच्या पुरातील चार मृतदेह उत्तर प्रदेशातील नारायणी-गंडक नदीत सापडले डीएनए केल्यानंतर सदर मृतदेह नेपाळकडे हस्तांतरीत केले
उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील नारायणी-गंडक नदीतून सापडलेले चार अज्ञात मृतदेह शवविच्छेदनानंतर नेपाळ प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. नेपाळमधील भीषण पुराच्या परिणामांना सीमेच्या दोन्ही बाजूंचे अधिकारी तोंड देत असतानाच हे पाऊल उचलण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तीन महिला आणि एका पुरुषाचे हे मृतदेह महाराजगंज जिल्हा रुग्णालयाच्या …
Read More »
Marathi e-Batmya