Editor

जयंत पाटील यांचा आरोप, शेतकऱ्यांवर, सर्वसामान्य लोकांवर मोठे संकट, सरकारकडे वेळ नाही पण बाकीचे उद्योग करण्यासाठी सरकारला भरपूर वेळ

शेतकऱ्यांवर, सर्वसामान्य लोकांवर मोठे संकट ओढवले आहे. त्यांच्यासाठी सरकारकडे वेळ नाही पण बाकीचे उद्योग करण्यासाठी सरकारला भरपूर वेळ आहे अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सरकारवर केली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रपरिषदेत विरोधी …

Read More »

राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया पूर्ण कुठल्याही अनुचित प्रकाराची नोंद नाही

राज्यातील १४ जिल्ह्यातील ८ नगर परिषदा व १४ नगर पंचायतीमधील एकूण ४७ रिक्त पदांकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यापैकी ८ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून तिर्थपुरी नगरपंचायतीतील एका जागेसाठी नामनिर्देशन प्राप्त न झाल्याने ती जागा रिक्त राहिली आहे. त्यामुळे उर्वरित ३८ जागांसाठी मतदान घेण्यात आले. राज्यातील १० जिल्ह्यांतील …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह १० विधयके मांडणार कर्जमाफी हे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे साधन;पावसाचा अंदाज पाहून पेरण्या करण्याचे आवाहन

शेतकऱ्यांना देण्यात येणारी कर्जमाफी हा राज्य शासनासाठी राजकीय विषय नसून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे साधन आहे. आगामी काळात कोणत्याही निवडणूक नसतानाही राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येणार असून सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. ही राज्यातील …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे आवाहन, विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे कर्जमाफीपासून वाढवण बंदरापर्यंत, मेट्रोपासून लाडकी बहीण योजनेपर्यंत सरकारच्या कामांचा आढावा

शेतकरी, महिला, कष्टकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत महायुती सरकारने राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी विक्रमी निर्णय घेतले आहेत. कर्जमाफी, शेतकरी मदत, लाडकी बहीण योजना, उद्योग गुंतवणूक, मेट्रो, विमानतळ, महामार्ग, बंदरे आणि गृहनिर्माण यांसारख्या विविध क्षेत्रांत राज्याने मोठी झेप घेतली असून विरोधकांनी बहिष्काराचे राजकारण सोडून सभागृहात येऊन विधायक चर्चा …

Read More »

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डि व्हान्स म्हणाले की, आम्ही आधीच मोठी प्रगती केली इस्रायलने लेबनॉनवर हल्ला केल्यानंतरही अमेरिकेची इराणसोबत स्वित्झर्लंडमध्ये चर्चा

स्वित्झर्लंडमध्ये इराणच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेच्या ताज्या फेरीनंतर अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी हा संदेश दिला. लेबनॉनवरील इस्रायली हल्ल्यांवरून निर्माण झालेल्या ताज्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने, वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यात गेल्या आठवड्यात झालेल्या सामंजस्य करारावर आधारित एक व्यापक करार करण्याचा वाटाघाटीकारांचा प्रयत्न आहे. ओबर्गेन येथील बर्गेनस्टॉक रिसॉर्टमध्ये झालेल्या लेक …

Read More »

तामिळनाडूत कारखान्यातील अमोनिया वायू गळतीमुळे सात कामगारांचा मृत्यू तर ६७ जण बाधित, सर्व कामगार स्थलांतरीत परप्रांतीय

तामिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यातील सी-फूड (समुद्री खाद्यपदार्थ) प्रक्रिया आणि निर्यात करणाऱ्या एका कारखान्यात अमोनिया वायूची गळती झाल्यामुळे किमान सात स्थलांतरित कामगारांचा मृत्यू झाला आणि इतर ६७ जण बाधित झाले. गळतीची माहिती मिळताच, अरक्कोनम येथील ‘नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स’च्या (NDRF) चौथ्या बटालियनच्या मुख्यालयाला त्वरित कळवण्यात आले आणि या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी …

Read More »

नितेश राणे यांची माहिती, आंबा-काजू उत्पादक, मच्छीमारांसाठी वाढदिवस साजरा करणार नाही पाऊस लांबला, पाणीटंचाई

कोकणातील आंबा आणि काजू पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मच्छीमारांचे झालेले नुकसान व राज्यातील अनेक भागांमध्ये एल-निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी यंदा २३ जून रोजी होणारा त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतकरी, …

Read More »

महाविकास आघाडीची मागणी, सरकारची कर्जमाफी फसवी, शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा हे महायुती सरकार नाही तर ५६ टक्के कमिशन सरकार, विरोधकांच्या प्रत्येक मुद्द्यावर सरकारने उत्तर द्यावे, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

राज्य सरकारच्या अपयशी कारभाराविरोधात आणि जनतेच्या प्रश्नांबाबत सरकारच्या असंवेदनशील भूमिकेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने विधानमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याची घोषणा आज पत्रकार परिषदेत करण्यात आली. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी राज्यातील गंभीर प्रश्नांकडे सरकारचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. राज्यात दुष्काळ,शेतकरी प्रश्न, महिलांवरील वाढते …

Read More »

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत योगाभ्यास विद्यापीठांनी जगासाठी योग प्रशिक्षक घडविण्याचे, राज्यपालांचे आवाहन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज महाराष्ट्र लोकभवन येथे भारतीय तटरक्षक दलातील अधिकाऱ्यांसह योगसत्रात सहभाग घेतला. यावर्षी लोकभवनातील योग दिवस भारतीय तटरक्षक दलाच्या सहकार्याने साजरा करण्यात आला. भारतीय तटरक्षक दल यंदा स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. योगसत्राला तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसेच महाराष्ट्र लोकभवनातील अधिकारी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन, आजारांना दूर ठेवण्यासाठी योग हा रामबाण उपाय जुहू बीचवरील फूड कोर्टजवळ आयोजित जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात बोलताना केले वक्तव्य

जीवनशैलीमध्ये झालेल्या बदलांमुळे सध्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. या आजारांना दूर ठेवण्यासाठी योग हा रामबाण उपाय आहे. त्यामुळे नियमित योग करून जीवनशैलीविषयक आजारांना दूर ठेवले पाहिजे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित केले. जुहू बीचवरील फूड कोर्ट जवळ आयोजित १२ व्या जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस …

Read More »