Editor

दुकानावरील पाट्यावर आणि शासकीय कामकाजात मराठी भाषा वापरा अन्यथा… मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी उद्योग, उर्जा, विधी व न्याय आदी विभागांतील शासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्यातील त्रुटी तत्काळ दूर करा, असे निर्देश मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी संबंधित विभागांना दिले. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मंत्रालायत संबंधित विभागाची बैठक घेण्यात आली. उद्योग विभागातंर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे संकेतस्थळ इंग्रजीसोबत मराठी भाषेत …

Read More »

परिवहन मंत्र्यांचं वरातीमागून घोडं ही तर चाकरमान्यांची फसवणूक- भाजपा नेते अँड आशिष शेलारांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा निर्णय आज परिवहन मंत्र्यांनी जो घोषित केला, तो वरातीमागून घोडं आहे, ही कोकणी माणसाची फसवणूक असल्याची टीका भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केली. कोकणातील चाकरमान्यांबाबत निर्णय योग्य वेळी घ्या, या विषयावर सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी …

Read More »

एसटी’ कर्मचाऱ्यांच्या पगारी होणार ५५० कोटी रूपयांचा निधी मंजूर परिवहन मंत्री अनिल परब यांच्या पाठपुराव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी मागील काही महिन्यापासून एस.टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पैसा नसल्याने पगारी देणेही महामंडळाला शक्य होत नव्हते. यापार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून वित्तीय मदत मिळावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करत होते. त्यास यश येत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाला (एसटी) ५५० कोटी रुपयांचा निधी देण्याचा …

Read More »

नगरविकास सचिव परदेशी निघाले संयुक्त राष्ट्रसंघात तर पुणे जिल्हाधिकारी पंतप्रधान कार्यालयात दोन्ही अधिकाऱ्यांसाठी पंतप्रधान कार्यालयाकडून पदमुक्तीचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी मुंबई महापालिका आयुक्त पदावर तडकाफडकी बदली करण्यात आलेले नगरविकास विभागाचे सचिव प्रविणसिंह परदेशी यांची संयुक्त राष्ट्रसंघाने त्यांच्या ग्लोबल कोर्डीनेटर या पदावर नियुक्ती केली. त्यामुळे त्यांना नगरविकास विभागाच्या सचिव पदावरून मुक्त करून संयुक्त राष्ट्रसंघात नियुक्तीसाठी परवानगी द्यावी अशी सूचना केंद्र सररकारने राज्याच्या मुख्य सचिवांना केली. तर पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी …

Read More »

राष्ट्रीय शिक्षण धोरण: उच्च शिक्षण , संशोधन आणि रोजगार संधी बंगरूळू येथील केएल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एस.एस.मंथा यांचा विशेष लेख

देशातील शालेय आणि उच्च शिक्षण एकाच छत्राखाली आणण्यासाठी केंद्र सरकारने नुकतेच राष्ट्रीय  शिक्षण धोरण जाहीर केले. या धोरणातील तरतूदीनुसार एकूण जीडीपीच्या ६ टक्के खर्च शिक्षणावर खर्च करण्यात येणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही सर्वाधिक रक्कम आहे. पण हे धोरण तयार करताना धोरणकर्त्या समितीने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पडणाऱ्या खंडाबद्दल किंवा विद्यार्थी गळजीबद्दल जर …

Read More »

भूमीपूजन… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवावरील कल्पनाधारीत कथा

दिन्या पुन्हा एकदा पेपरातले फोटो पाहू लागला . पेपराचे फाटलेले तुकडे पुन्हा पुन्हा तो जोडून जोडून रंग उडालेला चेहरा शोधत राहिला. दिन्या एका धार्मिक संस्थेचा कट्टर भक्त होता. बाबरी मस्जिद  पाडताना असंख्य विटा आपण कशा फेकल्या, किती जणांची डोकी फोडली याचा हिशोब तेंव्हापासून पोरं जनमल्या जनमल्या पोरांच्या जणू कानातच सांगायचा. …

Read More »

कोरोना : ३ ऱ्या दिवशीही १० हजाराहून अधिक घरी तर एकूण संख्या ४.५० लाखावर ८९६८ नवे बाधित रूग्ण तर २६६ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी राज्यात सलग तिसऱ्या दिवशी नविन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक असून आज दिवसभरात १० हजार २२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ८९६८ नविन रुग्णांची नोंद झाली. २ तारखेला ९९२६ तर १ ऑगस्टला १०७२५ जण बरे होवून घरी गेले. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने राज्यातील …

Read More »

मुंबईसह, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढणार हवामान खात्याचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या भागात उद्या ४ ऑगस्ट २०२० रोजी पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने आज दिला. तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागणार असणार असल्याची माहितीही त्यांच्याकडून एका प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली. यापूर्वीच ३ ते …

Read More »

राज्यभरात कायमस्वरूपी संसर्ग रुग्णालये उभारणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

ठाणे: प्रतिनिधी विकासात्मक कामांच्या व्यतिरिक्त आरोग्याच्या पायाभूत सुविधांना आणि सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल. भविष्यात साथींच्या आजारावर मात करण्यासाठी राज्यभरात समर्पित कायमस्वरूपी संसर्ग रुग्णालये उभारण्याची नितांत आवश्यकता असून त्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा करत कोविडशी लढताना राज्यातील पालिकांना निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे …

Read More »

भाजपाची पुन्हा राज्यपालांकडे धाव…. बिहारसाठी महाराष्ट्र पोलिसांच्या विरोधात तक्रार यावेळी विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याऐवजी मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली

मुंबई: प्रतिनिधी धार्मिक स्थळे त्वरित उघडा, गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना त्वरित दिलासा द्या, सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात बिहार पोलिसांना होत असलेल्या असहकाराबद्दल भाजपाच्या शिष्टमंडळाने पुन्हा एकदा राजभवनावर जात राज्य सरकारच्या विरोधात तक्रार केली. मात्र भाजपाच्या या शिष्टमंडळात यंदा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नव्हते. तर भाजपाचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा …

Read More »