मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोनाबाधीतांच्या संख्येत मुंबई महानगर प्रदेशासह राज्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत असली तरी या दोघांमध्ये अवघा १० हजार ११७ रूग्णसंख्येचा फरक आहे. राज्याच्या एकूण संख्येपैकी ७० ते ८० टक्के संख्या ही मुंबई महानगर असून आज झालेल्या २ हजार ६०८ रूग्ण संख्येमुळे ३६ हजार १७३ वर पोहोचली आहे. …
Read More »राज्यात ६० वाघांची नव्याने भर संख्या ३७२ वर पोहोचणार असल्याची वनमंत्री संजय राठोड यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यात एकूण ३१२ वाघ असून त्यापैकी एकट्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये १६० वाघांचे अस्तित्व आहे. त्यातच येत्या वर्षभरात या परिसरात आणखी ६० नवीन वाघाच्या बछड्यांची भर पडणारआहे. त्यावर उपाय म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील ५० वाघांना राज्यातील इतर जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली. यासंदर्भात नुकतीच नागपूर येथे …
Read More »एकाने १० तास ठेवले, त्याने दुसरीकडे पाठविले- अखेर अंत, आयुक्त- मुख्यमंत्रीसाहेब हे थांबणार कधी ? राजावाडीला गेलेल्या कोरोना पेशंटबाबतचा ह्दयद्रावक अनुभव .- नामदेव उबाळे माजी नगरसेवक घाटकोपर
मी राजावाडी हॉस्पीटलमध्ये रमाबाई आंबेडकर नगर वसाहतीच्या आनंदविकास चाळ येथील वय वर्ष ५७, पॉझीटिव्ह रूग्णास ६ तास झाले तरी दाखल करत नाही म्हणून प्रत्यक्ष गेलो.डीन डॉक्टर विद्या ठाकुर, डॉक्टर कल्पेश केणे यांच्याशी बोललो.सहा तास पॉझिटिव्ह पेशंट कठड्यावर झोपला आहे. त्याच्या बाजूला इतर लोक बसतात, यामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी …
Read More »भाजपाने १५ दिवसात अख्खा महाराष्ट्र सहभागी झाल्याचा दावा केला असता प्रत्येक प्रसिध्दीपत्रकासोबत मोफत हाजमोला गोळ्या वाटण्याचा काँग्रेस प्रवक्ते सावंत यांचा खोचक सल्ला
मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शुक्रवारी केलेले आंदोलन साफ फसले असतानाही लाखो कार्यकर्ते सहभागी झाल्याचा दावा करण्यासाठी दोनदा प्रेसनोट काढण्याची नामुष्की ओढवली तसेच आंदोलन यशस्वी झाल्याचे दाखवण्यासाठी त्यांचा संख्या वाढीचा वेग पाहता १५ दिवसात अख्खा महाराष्ट्रच सहभागी झाल्याचे दिसले असते. भाजपाच्या या हास्यास्पद दाव्याची पोलखोल …
Read More »आणि मुख्यमंत्र्यांची छाती अभिमानाने फुलली….केला सलाम कोविड योद्ध्यांना मुख्यमंत्री ठाकरेंकडून वैयक्तिक पत्र लिहून केले कौतुक
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झालेल्या कोविड योद्ध्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले असून प्रत्येक कोविड योद्ध्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात शस्त्राने नाही तर सेवेने आपल्याला हे युद्ध जिंकायचे आहे, असे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री आपल्या पत्रात म्हणतात की, आपल्या सर्वांना वैयक्तिक स्वरूपात पत्र लिहिताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझी …
Read More »रूग्णालयाच्या विरोधात या मेल आयडीवर तक्रार करा : बेडची माहिती लवकरच ऑनलाईन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : विशेष प्रतिनिधी मुंबईसह राज्यात कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच कोणत्या रूग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत, तसेच रूग्णावर करण्यात आलेल्या उपचाराचा खर्च वाटेल त्या पध्दतीने लावला जात आहे? यासह रूग्णालयाची तक्रार करायची असले तर ती ऑनलाईन पध्दतीने करता येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देत लवकरच …
Read More »आतापर्यंतची सर्वात मोठी विक्रमी रूग्णसंख्या मुंबईसह राज्यात तब्बल २९४० रूग्णांपैकी २२४९ एकट्या मुंबईत: राज्याची संख्या ४४ हजार ५०० वर
मुंबई: प्रतिनिधी मागील २४ तासात राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली असून आतापर्यंतची सर्वाधिक २ हजार ९४० रूग्णांचे निदान झाले. यापैकी मुंबईत २२४९ रूग्णांचे निदान झाले. तर ६३ जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या संख्या १५१७ वर पोहोचली आहे. राज्यातील कोरोनाबाधीतांची संख्या ४४ हजार ५८२ वर पोहोचली तर आज ८४० …
Read More »“माझे आंगण, रणांगण” मतदारसंघ सोडून फडणवीस, प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे आंदोलन अडीच लाख कार्यकर्त्यांनी केले आंदोलन
मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारच्या निष्क्रीय काराभाराच्या विरोधात भाजपाने पुकारलेल्या माझे आंगण, रणांगण आंदोलनात भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी आपला पुणे येथील मतदारसंघाऐवजी कोल्हापूरात फलक धरून आंदोलन केले. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपला नागपूरचा मतदारसंघ सोडून मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री विनोद …
Read More »भाजपा नेते तावडेंकडून शिक्षण विभागाचे कौतुक करत व्यक्त केली अपेक्षा कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात महाराष्ट्राचा चढता आलेख
मुंबई: प्रतिनिधी २०१४ मध्ये आलेल्या भाजपा सरकारने शिक्षण विभागात व्यवस्थापकीय आणि प्रशासनिक बदल केल्यानंतर २०१८ ला त्याचे चांगले परिणाम आल्याचे या अहवालातून सिद्ध होते आहे. शिक्षण विभागात असे व्यवस्थापकीय आणि प्रशासनिक बदल केले तर त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत असतो. त्यामुळे सामान्यत: शिक्षण मंत्री किंवा शिक्षण सचिव हे करण्यास फार …
Read More »चंद्रकांत पाटलांचे आंगण कोणते? फडणवीस तरी स्वत:च्या मतदारसंघात फिरले का ? आजची काळी कृती महाराष्ट्र कधीही विसरणार नाही- बाळासाहेब थोरात
मुंबई: प्रतिनिधी विरोधी पक्षाने कोरोनाच्या संकटात सरकाला काही विधायक सूचना केल्या तर त्यांचे स्वागतच केले जाईल. परंतु त्यांना राजकारणच करायचे असल्याने रोज राजभवनाच्या फेऱ्या मारून आता त्यांनी घरच्या अंगणालाच रणांगण केले आहे. चंद्रकांतदादा पाटील यांचे खरे आंगण कोणते? पुणे की कोल्हापूर? देवेंद्र फडणवीस तरी त्यांच्या नागपूरला गेले का? त्यांच्या मतदारसंघात …
Read More »
Marathi e-Batmya