Editor

शासकिय नियमाचा गृहनिर्माण मंत्र्यांकडूनच भंग बैठका टाळण्याचे आदेश असतानाही बंगल्यावर अधिकारी विकासकांसोबत बैठका

मुंबईः विशेष प्रतिनिधी दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकिय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संख्यावर नियंत्रण आणि मंत्रालयासह शासकिय कार्यालयांमध्ये बैठकांचे आयोजन करू नये असे आदेश नुकतेच काढले. मात्र या आदेशालाच केराची टोपली दाखवित गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच्या बंगल्यावर विकासक, अधिकाऱ्यांचा दिवसभर बैठकांचा धडाका लावल्याची माहिती पुढे आली आहे. कोरोना व्हायरसचा …

Read More »

शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवायचीय मग वाचा हे उपाय आयुर्वेदीक डॉक्टर शेखर मगर यांचा सल्ला

पावसाळा आला की ताप, थंडी, सर्दी, न्युमोनिया आदी आजारांचा सामना करावा लागतो. तर हिवाळ्यात सर्दी, कफचा त्रास यासह अन्य आजारांचा सामना करावा लागतो. तर उन्हाळ्यात डिहायड्रेशन, हिवताप, ताप येणे आदी सारख्या आजारांचा सामना व्यक्तींना करावा लागतो. त्यामुळे ऋतु कोणताही असो पण जर माणसाच्या शरीराची प्रतिकार शक्ती जर चांगली असेल तर …

Read More »

कोरोनाच्या लढाईत वैद्यकिय शिक्षण मंत्र्याची पहिल्यांदा हजेरी १३३० बेडचे 'विलगीकरण कक्ष' कार्यान्वित होणार असल्याची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुखांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जाणवायला लागल्यानंतर राज्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मदतीला आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हेच धावल्याचे चित्र दिसत असताना राज्य मंत्रिमंडळातील वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख मात्र कोठेच दिसत नव्हते. अखेर चार-पाच दिवसानंतर त्यांनी पहिल्यांदाच बैठक घेतल्याचे दिसून येत …

Read More »

पनवेलमध्ये सर्व बंद तर ठाण्यात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी ठाणे, मीरा-भाईंदर, पनवेल महापालिका आयुक्तांचा निर्णय

पनवेलः प्रतिनिधी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मुंबई महानगर प्रदेशातील पनवेल महापालिकेने शहरातील जीवनावश्यक दुकाने वगळता सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर ठाणे जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली असून मीरा भाईंदर येथील सर्व धार्मिकस्थळे बंद करण्याचा निर्णय या तिन्ही महापालिकांच्या आयुक्तांनी आज घेतला. पनवेलमधील अत्यावश्यक …

Read More »

सरकार स्वतःहून निर्णय घेवू शकते, मात्र मुंबईकरांनाे घराबाहेर पडणे टाळा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नागरिकांना इशारा

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील परिस्थिती चिंताजनक नाही. मात्र काळजी करण्यासारखी नक्कीच आहे. त्यामुळे आता ज्याप्रमाणात गर्दी ओसरली आहे. त्यापेक्षा आणखी कमी झाली पाहिजे मी म्हणतो की बंदच झाली पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मांडत लोकल, बसेस आदी गोष्टी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकार घेवू शकते मात्र नागरिकांनी स्वतःहूनच …

Read More »

परदेशी प्रवास आणि लक्षणे असतील तरच कोरोना चाचणी होणार मुंबईसह ८ ठिकाणी चाचणी केंद्रे सुरु करणार असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

पुणेः प्रतिनिधी कोरोना व्हायरसची अनुषंगाने समाजात मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरत आहेत. त्यामुळे एखादा परदेशी प्रवास करून आला असेल आणि एखाद्यामध्ये तशी लक्षणे दिसत असतील तरच त्या व्यक्तीची कोरोना व्हायरसची चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. एनआयव्ही फाऊंडेशन संस्थेला भेट दिल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. …

Read More »

कोरोना औषधांची खोटी जाहीरात करणाऱ्यांवर कारवाई करणार अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी कोरोनासंदर्भांत शासन व्यापक प्रमाणात जनजागृती करीत असतांना विविध वस्तुंची निर्मिती करणारे काही उत्पादक आणि जाहिरातदार विशिष्ट प्रकारच्या गादीचा/सोफ्याचा वापर केल्यास किंवा विशिष्ट आयुर्वेदिक औषधांचे सेवन केल्यास कोरोनाचा प्रादूर्भाव होणार नसल्याच्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणाऱ्या उत्पादकांवर आणि जाहिरातदारांवर व जाहिरात प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांवर अन्न व औषध …

Read More »

खबरदार, मास्क, सँनिटायझरची साठेबाजी आणि काळाबाजार कराल तर जीवनाश्वक कायद्याखाली कारवाईचा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटामुळे केंद्र सरकारच्या १३ मार्च, २०२० च्या अधिसूचनेन्वये जीवनावश्यक वस्तु अधिनियम, १९५५ च्या परिशिष्टामध्ये कलम २ ए अंतर्गत ‘मास्क (२ प्लाई व ३ प्लाई सर्जिकल मास्क, एन-९५ मास्क) व हँन्ड सॅनेटाइझर यांचा समावेश जीवनावश्यक वस्तू म्हणून करण्यात आला आहे. या दोन वस्तुंचा काळाबाजार व …

Read More »

४ तारखेला कोरेगांव-भीमा आयोगासमोर शरद पवार हजर राहणार अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबईः विशेष प्रतिनिधी दोन वर्षापूर्वी कोरेगांव भिमा येथे झालेल्या दंगलीची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या कोरेगांव भिमा चौकशी आयोगासमोर साक्ष देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे हजर राहणार आहेत. चार तारखेला ते साक्ष देण्यासाठी आयोगासमोर हजर राहणार असल्याचे यापूर्वीच आयोगाला कळविण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री …

Read More »

अखेर तावडेंच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे स्वातंत्र्य संपुष्टात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात समाविष्ट करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबईः विशेष प्रतिनिधी माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आणत या मंडळाचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात समाविष्ट करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सर्व मुलांना एकसमान गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे शासनाचे धोरण असताना काही मोजक्या मुलांसाठीच उच्च …

Read More »