Editor

अजितदादांचा अर्थसंकल्प म्हणजे खोदा पहाड…. भ्रमित करणारा अर्थसंकल्प असल्याची मुनगंटीवारांची टीका

मुंबईः विशेष प्रतिनिधी महाविकास आघाडीने मांडलेल्या अर्थसंकल्पाचे वर्णन म्हणजे खोदा पहाड निकला छोटेसे चुहे का तुकडा आणि भ्रमित सरकारचा अर्थसंकल्प असल्याची टीका करत हा अर्थसंकल्प सादर करायच्या आधी अजित पवार यांनी स्वतःचे २०१७ सालचे स्वतःचे भाषण तरी वाचायला हवे होते अशी उपरोधिक खोपरखळी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री अजित …

Read More »

फडणवीस म्हणाले, अजितदादांचा अर्थसंकल्प नव्हे तर सभेतले भाषण फक्त दोन जिल्ह्यांचा अर्थसंकल्प

मुंबईः विशेष प्रतिनिधी अर्थसंकल्प हा मागील वर्षात किती तूट झाली, आता किती होणार आहे, शिल्लक किती राहणार आहे, गुतंवणूक किती होणार आहे याची कोणतीही माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी न देता एखाद्या सभेत भाषण केल्याप्रमाणे त्यांनी भाषण केल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत फक्त दोन जिल्ह्यांसाठीचा अर्थसंकल्प …

Read More »

आर्थिक मंदीच्या प्रभावाखालचा ३१ हजार तूटीचा अर्थसंकल्प सादर पेट्रोल-डिझेलवरील करवाढीसह फक्त तीन नव्या घोषणा

मुंबईः विशेष प्रतिनिधी आंतरराष्ट्रीयस्तरावरील आर्थिक मंदी आणि राष्ट्रीयस्तरावर अर्थव्यवस्थेच्या सुधारणेसाठी करण्यात येत असलेल्या अपुऱ्या उपाय योजनांचे पडसाद अर्थसंकल्पात उमटले. राज्य सरकारला यंदाच्या वर्षी ३१ हजारांच्या वित्तीय तूटीला सामोरे जावे लागणार आहे. त्यातच बांधकांम क्षेत्राला चालना देण्यासाठी मुंद्रांक शुल्कात १ टक्का सूट तर उद्योगांना पुरविण्यात येणाऱ्या वीज दरात कपात करत ७.५ …

Read More »

कोरोनापासून बचाव करायचाय तर हात मिळवू नका, हात स्वच्छ धुवा मुख्यमंत्री, आरोग्य सचिव प्रदीव व्यास, आयुक्त परदेशींची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यात करोनाचा एकही रूग्ण आढळून आला नाही. तसेच या आजाराचा सामना करण्यासाठी राज्य सरकार आणि आरोग्य विभागाकडून पुरेशी खबरदारी घेण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. या आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, हात स्वच्छ धुवणे, हात मिळविण्याचे टाळावे, कोणाशीही बोलताना किमान तीन फुटाचे अंतर …

Read More »

कोरोनाची भीती नका बाळगू मुख्यमंत्री ठाकरेंचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुरेशी खबरदारी घेतली आहे. नागरिकांनी भय‍भीत होवू नये. असे आश्वस्त करतानाच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नका, होळी साजरी करताना तिचे स्वरुप मर्यादित ठेवा. मुंबई पाठोपाठ पुणे, नागपूर येथील विमानतळांवर थर्मल स्कॅनिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये येणाऱ्या परदेशी नागरिकांची तपासणी करण्याचे निर्देश …

Read More »

शेतकऱ्यांच्या ७-१२ वर पुन्हा कर्जाची नोंदणी चालू वर्षात १८ हजार कोटी रूपयांचे वाटप

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील कर्जमुक्त करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेली असली तरी दुसऱ्याबाजूला शेतकऱ्यांच्या ७-१२ वर पुन्हा कर्जाची नोंद करण्याची व्यवस्था राज्य सरकारकडूनच करण्यात आल्याची माहिती आर्थिक सर्व्हेक्षण अहवालातून उघडकीस आली आहे. तत्कालीन भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ३५ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी २५ …

Read More »

अपेक्षेप्रमाणे राज्याची अर्थव्यवस्था वाढलीच नाही ६.५ नव्हे तर ५.७ च्या गतीने अर्थव्यवस्था वाढणार

मुंबईः विशेष प्रतिनिधी यंदाच्यावर्षी राज्याची अर्थव्यवस्था ६.५ टक्क्याने वाढणार असल्याची घोषणा तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. मात्र चालू वर्षासाठीच्या जाहीर झालेल्या आर्थिक सर्व्हेक्षण अहवालानुसार राज्याची अर्थव्यवस्था ६.५ नव्हे तर ५.७ टक्क्याने वाढणार असल्याचे नमूद करण्यात आल्याने तब्बल १.५ टक्क्याने अर्थव्यवस्थेचा गाडा घसरल्याचे स्पष्ट होत आहे. विधिमंडळात २०१९-२० चा …

Read More »

शिवस्मारकाच्या निविदेबाबत कॅगच्या आक्षेपांची चौकशी करणार सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाकरिता राज्य शासन आग्रही आहे. मात्र यापूर्वी झालेल्या निविदा प्रक्रियेबाबत महालेखाकारांनी उपस्थित केलेल्या गंभीर आक्षेपांची चौकशी करून त्यानंतरच पुढील धोरणात्मक निर्णय घेतले जातील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज विधान परिषदेत दिली. विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात आज शिवस्मारकाबाबत तारांकित प्रश्न …

Read More »

अबु आझमी म्हणाले, एक महिना द्या सगळं बंद करून दाखवतो राज्य सरकारला आव्हान मादक द्रव्ये बंद करा अन्यथा

मुंबईः विशेष प्रतिनिधी मुंबईतील अनेक भागात नशेली पदार्थ मिळत आहेत. अशा पध्दतीच्या पदार्थांची विक्री बंद करणे राज्य सरकारच्या हातून होणार नसेल तर माझ्या हातात द्या एक महिन्यात अशा गोष्टी बंद करून दाखवतो असे आव्हान समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी राज्य सरकारला दिले. या आव्हानाची तात्काळ दखल घेत विधानसभाध्यक्ष पटोले …

Read More »

कॅगच्या न्यायालयात फडणवीस सरकार दोषी ऊर्जा, सिडको-नगरविकास, परिवहन, एमएसआरडीसीच्या कारभारावर ठपका

मुंबईः विशेष प्रतिनिधी गतीमान सरकार, पारदर्शक सरकारचा नारा देत राज्यात  विराजमान झालेल्या भाजपा सरकारने आपल्या कार्यकाळात विकासकामांच्या नावाखाली गुंतवणूक वाढविली. मात्र दुसऱ्याबाजूला या वाढविलेल्या गुंतवणूकीचा परतावा मिळविण्याऐवजी नुकसानीचा कारभार केला असून एमएसआरडीसी, परिवहन विभाग, ऊर्जा विभागाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. तर सिडकोच्या निविदा वाटपात मोठ्या प्रमाणावर नियमांचे उल्लंघन …

Read More »