Editor

शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या वैभवशाली वारशाचा खेळ करु नका पवित्र गडकिल्ल्यांवर बाजार न मांडण्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचे आवाहन

मुंबईः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांवर हेरिटेज पर्यटनाच्या नावाखाली हॉटेल, रिसॉर्टला परवानगी देण्याचा निर्णय संतापजनक आहे. शिवरायांच्या वैभवशाली वारसा स्थळांवर बाजार मांडून मराठी अस्मितेचा अपमान करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला दिला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने …

Read More »

भाजपातली मेगाभरती ही कारवाईच्या धाकापोटीच नेत्यांच्या संस्थामधील भ्रष्टाचाराचा मेगाभरतीसाठी आधार

मुंबईः प्रतिनिधी मागील काही महिन्यापासून पश्चिम महाराष्ट्रातील आजी -माजी खासदार आमदार आदी भाजपात प्रवेश करत आहेत. मात्र या प्रत्यक्ष पक्ष प्रवेशामागे त्या त्या नेत्यांच्या संस्थांमध्ये सदरच्या नेत्यांनी केलेल्या लाखो-करोडो रूपयांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे सरकारी यंत्रणेच्या हाती आल्याने या पुराव्याच्या आधारे कारवाईचा धाक दाखवित मेगाभरतीचे आमंत्रण देण्याचा सपाटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि …

Read More »

अन्यथा झोपडपट्टीधारक विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार मुंबई आणि ठाणे झोपडीधारकांमध्ये भेदभाव करत असल्याचा संघटनेचा आरोप

ठाणेः प्रतिनिधी येत्या ४८ तासात ठाण्यातील 210 झोपडपट्टीतील रहिवाशांना मुबंईप्रमाणे ३०० स्क्वेअर फुटांचे घर दिले नाही तर येणाऱ्या सोमवारी झोपडपट्टीवासीयांचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चा काढूनही मागणी मान्य न झाल्यास आगामी विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ठाणे शहर झोपडपट्टी रहिवासी संघटनेने एका पत्रकार परिषदेत दिला आहे. २०११ …

Read More »

राज्य निवडणूक आयुक्तपदी यू. पी. एस. मदान यांची नियुक्ती राज्यपाल कोशयारी यांच्याकडून पहिलीच नियुक्ती

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून यू. पी. एस. मदान यांनी आज पदभार स्वीकारला. राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांनी त्यांची नियुक्ती केली. मदान 1983 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू झाले होते. राज्याच्या मुख्य सचिवपदाचीही धुरा त्यांनी सांभाळली आहे. तत्पूर्वी त्यांनी राज्यात विविध ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी …

Read More »

आर्थिक मंदी नाही तर भाजप नेत्याने स्वतः च्या कंपनीतील ४०० जणांना का काढले? राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी भाजपाच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था मंदीच्या भोवऱ्यात सापडली आहे. तरीही केंद्र सरकार आणि भाजपाकडून देशात मंदी नसल्याचे सांगण्यात येत आहे. मग देशात मंदी नाही तर मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी त्यांच्या कंपनीतील ४०० जणांना का काढले असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी …

Read More »

मंत्रालयात अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावली “उपहारगृह” ची माणूसकी…! १२ जणांनी एक हजारहून अधिक व्यक्तींच्या जेवणाची केली व्यवस्था

मुंबईः प्रतिनिधी मुंबईत कालपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीचा आज बुधवारी भलताच मुंबईकरांना फटका बसला. ऐरवी सकाळी सुरु झालेले मंत्रालय संध्याकाळी रिकामे होते. मात्र या अतिवृष्टीचा परिणाम शहरातील सर्वच वाहतूक व्यवस्थेवर झाल्याने मंत्रालयातील कर्मचाऱी-अधिकाऱ्यांना मंत्रालयातच थांबण्याशिवाय पर्याय उरला नाही. मात्र या अडकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी उपगृहातील कर्मचाऱ्यांच्या माणूसकीने धाव घेत या सर्वांची अल्प दरात …

Read More »

राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्र्यांच्या अनुपस्थितीत वन स्टॉप सेंटरचे उद्घाटन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते सेंटरचा प्रारंभ

मुंबई : प्रतिनिधी अत्याचारग्रस्त महिलांना एकाच छताखाली वैद्यकीय मदत, कायदे विषयक मदत, समुपदेशन, मानसोपचार तसेच गरज असल्यास तात्पुरत्या आश्रयाची सुविधा उपलब्ध करुन देणारे ‘वन स्टॉप सेंटर आजपासून केईएम रुग्णालयात सुरु करण्यात आले. मात्र या कार्यक्रमाला राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी पाठ फिरवली असून दुसऱ्यांदा त्यांनी केंद्रीय …

Read More »

रात्रौ १.३० वाजता सापडली मंत्रालयात महिला मंत्रालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मुंबईः प्रतिनिधी राज्याचे प्रशासकिय मुख्यालय असलेल्या मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी पोलिस दलास तैनात करण्यात आले आहे. मात्र याच सजग पोलिसांच्या तैनातीतही काही दिवसांपूर्वी माहिती चोरी (डेटा चोरी) चे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रात्री १.३० वाजता एक अज्ञात महिला मंत्रालयात फिरताना आढळून आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली असून यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा …

Read More »

आणि पावसाने मुंबई-उपनगर झाले धिमी मुसळधार पावसाने पाणी साचल्याने रेल्वे, रस्ते वाहतूकीची कोंडी

मुंबईः प्रतिनिधी मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरु असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, वसई, दादर आणि पालघर या भागात पावसाचा जोर कायम राहिल्याने सायन, हिंदमाता, किंग्ज सर्कल, कुर्ला येथील सखल भागांत पाणी साचलं आहे. रस्त्यांबरोबर अनेक रेल्वे ट्रँकवरही पाणी साचल्याने रेल्वेसहित रस्त्यावरील वाहतूकही धीमी झाल्याचे …

Read More »

वंचित आघाडी उज्ज्वला गँस वापरणाऱ्यांना १०० रू. अनुदान देणार आशा, अंगणवाढी सेविकांच्या मानधनात वाढ करणार असल्याची आंबेडकर यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी राज्यात सत्तेवर आल्यानंतर राज्यातील उज्ज्वला गँस वापरणाऱ्या कुटुंबियाना एका गँस मागे १०० रूपयांचे अनुदान देणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात वाढ करण्याचे जाहीर आश्वासन देत महाराष्ट्रात आज ६९ हजार आशा …

Read More »