Editor

भीमा कोरेगांव प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची महाविकास आघाडी सरकारकडे मागणी

पुणेः प्रतिनिधी एक वर्षापूर्वी पुण्यात एल्गार परिषद झाली. त्यानंतर भीमा कोरेगांव येथे दंगल झाली. मात्र यासंपूर्ण प्रकरणात पोलिसांचे वागणे आक्षेपार्ह असून त्यांच्याकडून अधिकाराच गैरवापर झालेला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी अशी मागणी राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडे करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले. केवळ नक्षलवादाच …

Read More »

संकटातील अर्थव्यवस्थेवरून लक्ष हटविण्यासाठी नागरीकत्व कायदा आणला भारतातील धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता- शरद पवारांची भीती

पुणेः प्रतिनिधी देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक आणि संकटात असताना नागरीकत्व कायदा (CAA) कायदा आणून या मुळ मुद्यावरून लक्ष हटविण्यासाठीच हा विषय पुढे आणण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. तसेच या कायद्यामुळे देशाच्या धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता असल्याची भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. पुण्यात आयोजित पत्रकार …

Read More »

गिरणी कामगारांच्या घरांसाठी पनवेल येथे जागा हक्काची घरे देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्नः मंत्री जयंत पाटील

नागपूरः प्रतिनिधी मुंबईतील गिरणी कामगारांना हक्काची घरे देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारचा आहे. त्यादृष्टीकोनातून शहरातील ३८ गिरण्यांच्या जमिनीवर २४ हजार घरे तर उरलेली पनवेल येथील कोन गाव येथे पर्यायी जागा उपलब्ध असल्याची माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली. विधानसभेत विचारण्यात आलेल्या लक्षवेधी सुचनेला उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली. गिरण्या …

Read More »

संविधान बदलण्याचा भाजप सरकारचा डाव हाणून पाडा काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे आवाहन

नागपूरः प्रतिनिधी संविधानामुळे आपल्या देशात लोकशाही रूजली आणि वाढली. हेच संविधान बदलून देशात हुकुमशाही आणण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव आहे. संविधानाचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपचा डाव हाणून पाडण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. …

Read More »

मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात निवेदन सादर

नागपूरः प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला वैद्यकीय शिक्षणात देण्यात आलेल्या आरक्षणाबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान राज्य सरकारकडून निवेदन सादर केल्याने न्यायालयाने पुढील सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले. सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 62 द्वारे राज्यातील सामाजिक व आर्थिक मागास समाज प्रवर्गास आरक्षण …

Read More »

नागरिकत्व कायदा विरोधी नागपूर, मालेगांव, मुंबईत मोर्चे दिल्लीत इंटरनेट सेवा बंद, लखनौमध्ये दगडफेक जाळपोळ, प.बंगालमध्ये भव्य रॅली

नागपूर/मुंबई/ मालेगांव- प्रतिनिधी नुकत्याच केंद्र सरकारने मंजुर केलेल्या नागरीकत्व कायद्याला दिवसेंदिवस विरोध होत असून सुरुवातीला दिल्ली आणि पश्चिम बंगालपर्यंत असलेले विरोधाचे लोण आता मुंबईसह महाराष्ट्रात आणि लखनौमध्ये पसरत चालले आहे. नागपूर आणि मालेगाव येथे या कायद्याविरोधात मोर्चा काढण्यात आला. तर मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने …

Read More »

फडणवीसांच्या उद्विग्न प्रश्नांना मुख्यमंत्री ठाकरेंची दिलखुलास उत्तरे भारूडाला अभंगातून आणि विडंबनातून जवाब

नागपूरः विशेष प्रतिनिधी राज्यपालांच्या अभिभाषणावरील ठरावाच्यावेळी काल काहीजणांनी हे चालेची ना ते चालेची ना सारखे काहीतरी म्हणत होते. मात्र आम्ही कमी बोलतो, जास्त काम करतो असे सांगत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भाषेत सांगायचे तर संताचा तो प्रचार अमर, अजूनही लोक-मनावर, राज्य चालवोनी निरंतर, लाखो जीवा उद्धरितो अशा पध्दतीचे आमचे राज्य …

Read More »

काँग्रेस पक्ष तरूणांना मोठी संधी देणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

नागपूरः प्रतिनिधी काँग्रेस पक्षाचा विचार हा सर्वसमावेशक आणि शाश्वत विचार आहे. भारतीय जनता पक्षाच्या धर्मांध आणि विभाजनवादी अजेंड्याला राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव वाढवणारा काँग्रेस विचारच रोखू शकतो. काँग्रेसची विचारसरणी तळागाळापर्यंत पोहोचवून संघटना मजबूत करण्यासाठी तरूणांना मोठ्या प्रमाणात संधी देणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री …

Read More »

फडणवीस अभिभाषणावर बोलताय की सत्तेपासून वंचित राहिल्याचे दुःख व्यक्त करताय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा विरोधी पक्षनेत्यांना टोला

नागपूरः प्रतिनिधी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणावरील चर्चेला सुरुवात झाली. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत होते की सत्तेपासून वंचित राहिल्याचे दुःख व्यक्त करत होते तेच कळत नव्हते. फडणवीस म्हणाले की श्रद्वेय बाळासाहेबांप्रती त्यांना आदर आहे. आदर होता तर उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द का नाही पाळला ? …

Read More »

शेतकरी आशेने बघतोय मात्र सरकारकडून फसवणूक सुरूय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

नागपूरः प्रतिनिधी राज्यात तीन पक्षांचे मिळून सरकार सत्तेवर बसलय. सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या सरकारकडून शेतकऱ्यांची अजूनही फसवणूकच करण्यात येत असून कर्जमाफीची घोषणा अद्याप केली नाही. उलट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी केवळ ५ हजार ६०० कोटी रूपयांची तरतूद केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …

Read More »