Editor

आज पुन्हा थोडीशी संख्या वाढली राज्यात ८ हजार ५९० वर पोहोचले रूग्ण तर मुंबईत ५ हजार ७७६

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत काल रविवारच्या तुलनेत आज पुन्हा वाढ झाली असून मागील २४ तासात ५२२ रूग्णांचे निदान झाले आहे. तर मुंबईतील रूग्णांची संख्या आज ५ हजार ७७६ वर पोहोचली असून तब्बल २७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आजपर्यंत १२८२ रूग्ण बरे होवून घरे गेल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री …

Read More »

बँकानो, शेतकरी थकबाकीदार नाही कर्ज द्या केंद्रामार्फत आरबीआयला विनंती करण्याचा राज्य मंत्रिमंडळात निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ मधील पात्र परंतु सध्या निधी अभावी लाभ मिळू न शकलेल्या खातेदारांना बँकांनी थकबाकीदार न मानू नये. तसेच त्यांना खरीप २०२० साठी नवीन पिक कर्ज द्यावे अशी विनंती केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतीय रिझर्व्ह बँकेस करण्याचा निर्णय झाला. कोविडमुळे …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीसाठी मंत्रिमंडळाची राज्यपालांना पुन्हा विनंती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्यावर कोरोनाचे संकट असताना साधारणत: १० दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राज्य मंत्रिमंडळाने प्रस्ताव पाठवित मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सध्या रिक्त असलेल्या राज्यपाल नियुक्त जागेवर नियुक्त करण्याची मागणी केली होती. मात्र त्यावर अद्याप निर्णय न घेण्यात आल्याने राज्यपालांना मंत्रिमंडळाच्यावतीने पुन्हा एकदा विनंती करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या …

Read More »

मंत्रालयात सापडले कोरोनाग्रस्त रूग्ण भाजपा नेत्याच्या क्रिस्टल कंपनीकडे कंत्राट

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या शासकिय कारभाराचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातची स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे या रूग्णांना मंत्रालयातून पुढील उपचारासाठी नेण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. शासकिय कर्मचाऱ्यांचेही कोरोना विषाणूपासून संरक्षण व्हावे या उद्देशाने राज्य सरकारने कर्मचाऱ्यांची संख्या ५ टक्केवर आणली आहे. तसेच …

Read More »

अन्यथा रूग्णालयांवर कारवाईशिवाय पर्याय नाही संख्या ६० वर नेणार: पीपीई कीट, मास्क राज्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या संकटामुळे खाजगी हॉस्पिटल्स बंद असून डायलीसीससारख्या रुग्णांची परवड होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा प्रकारच्या तक्रारी मुंबई, पुणे शहरातून जास्त प्रमाणात येत आहेत इतर भागातून नाहीत परंतु मुख्यमंत्र्यासह आम्ही सर्वांनी खाजगी हॉस्पिटल्सना मानवतेच्यादृष्टीने सेवा चालू ठेवण्याचे आवाहन केलेले आहे अशा स्थितीतही खाजगी हॉस्पिटल्स सुरु नाही केली …

Read More »

तुम्ही आमच्यासाठी बाहेर तर आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर ठाणे शहरातील नवतरूणांकडून असाही मदतीचा हात

ठाणे: प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठिकठिकाणी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तसेच या लॉकडाऊनमुळे अनेकांवर रोजगार बंद झाल्याने घरात बसण्याची वेळ आली. मात्र अशा परिस्थितीत नागरिकांसाठी झटणाऱ्या पोलिस, होमगार्ड आणि कष्टकरी वर्गाला दोन वेळचे घास सुखाने खाता यावेत यासाठी शहरातील परिक्षित धुमे आणि त्याची मित्रमंडळी तयार जेवणाचे पाकिट्स आणि अन्न …

Read More »

पुण्यात कोरोनाला रोखण्यासाठी या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आणखी एक पाऊल

मुंबई: प्रतिनिधी पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी एक पाऊल टाकलं असून त्यांच्या निर्देशानुसार चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची पुणे शहरासाठी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये अनिल कवडे,सौरभ राव, सचिंद्र प्रतापसिंग आणि कौस्तुभ दिवेगावकर यांचा समावेश आहे. पुणे विभागीय आयुक्त आणि …

Read More »

पालकमंत्री मलिक म्हणाले, परभणीकरांनो कोरोनामुक्त झाल्याबद्दल अभिनंदन पुढेही कोरोनामुक्तच राहिल असा विश्वास

परभणी: प्रतिनिधी कोरोना बाधित रुग्णाचा दुसरा अहवालही निगेटिव्ह आल्याने परभणी जिल्हा अखेर कोरोनामुक्त झाला आहे. यासाठी मेहनत घेणार्‍या सर्व यंत्रणांचे अल्पसंख्याक मंत्री आणि परभणी जिल्हयाचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी आभार मानतानाच यंत्रणेने घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले आहे. सुरुवातीपासूनच परभणी जिल्हा कोरोनामुक्त होता मात्र एक कुटुंब पुण्यातून आल्यावर त्यातील एकाचा अहवाल …

Read More »

आम्ही बेरोजगार होतो, पण आता आम्ही देणारे आहोत अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज योजनेतून यशस्वी झालेल्या तरुणांकडून कोरोना संकटग्रस्तांना मदत

मुंबई : प्रतिनिधी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत व्यावसायिक कर्ज घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहिलेले अनेक तरुण आता स्वयंपूर्ण झाले असून कोरोनाच्या संकटात ते आता इतरांना मदत करीत आहेत. काही काळापूर्वी बेरोजगार असलेल्या या तरुणांना महामंडळाने कर्जाच्या रुपाने मदतीचा हात दिला आणि त्यांना व्यवसाय करण्यास प्रेरीत केले. व्यवसायात यशस्वी …

Read More »

पंतप्रधान मोदींचे भाकित, कोरोनाला सोबत घेवून चालावे लागणार मुख्यमंत्र्यांबरोबरील आजच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सूचनांचा पाऊस

मुंबई-नवी दिल्ली: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात आपण दोनवेळा लॉकडाऊन केला. या काळात आलेले अनुभव आणि प्रश्नांचे मुल्यांकन करून कोणत्या शहरात, भागात लॉकडाऊनची गरज आहे याबाबतची माहिती घेवून राज्य सरकारांनी लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यावा असे सांगत आपल्या सोबत कोरोना बराच काळ राहणार असल्याचे अशी भाकित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Read More »