Editor

बदलापूर शाळेतील अल्पवयीन मुलींचे दहावीपर्यंत प्रवेश शुल्क शासनामार्फत भरण्यास विशेष मान्यता शासन निर्णय जारी करत दिली मान्यता

बदलापूर येथे ऑगस्ट २०२४ मध्ये एका शाळेत अनुचित घटना घडली होती. त्या घटनेनंतर त्यातील दोन अल्पवयीन मुलींच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी त्यांच्या इयत्ता दहावीपर्यंतच्या शिक्षणाचा प्रवेश शुल्काचा संपूर्ण खर्च शासनामार्फत अदा करण्यास, एक वेळची विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. …

Read More »

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अनावरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्यजण उपस्थित

पुणे महानगरपालिकेच्यावतीने संभाजी महाराज उद्यान येथे उभारण्यात आलेल्या बुधभूषण ग्रंथ रचनाकार छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, …

Read More »

वाशिममध्ये पेट्रोल पंपावरील लावलेल्या लाईनतील नंबरवरून नागरिकांमध्ये हाणामारी इंधन तुटवडा आणि शेकडो लोक एकाचवेळी पेट्रोल पंपावर जमा झाले

इंधनाच्या तुटवड्यामुळे डिझेल आणि पेट्रोल खरेदी करण्यासाठी शेकडो लोक जमल्याने महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील एका पेट्रोल पंपावर लाईनतील नंबरवरून गोंधळ उडाला आणि नागरिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला. वाशिम येथील इंडियन ऑइलचे डीलर जितेंद्र चोप्रा यांनी सांगितले की, शनिवारी दुपारी २.३० ते ३ च्या सुमारास १५,००० लिटर डिझेल आणि ५,००० लिटर पेट्रोल घेऊन …

Read More »

जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांची स्पष्टोक्ती, तामिळनाडूतील परिस्थिती वेगळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या राजकीय यशाचा तुलनात्मक अभ्यासावेळी केले वक्तव्य

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी, त्यांच्या राजकीय प्रवासाची तुलना विजय यांच्या जलद उदयाशी केली जात असताना, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमधील राजकीय परिस्थिती एकाच दृष्टिकोनातून पाहता येणार नाही, असे वक्तव्य केले. विषेश म्हणजे पवन कल्याण हे आंध्र प्रदेशामधील तेलगू चित्रपटसृष्टीतील अभिनेते आहेत. तर तामिळनाडू चित्रपटसृष्टीतील अभिनेते …

Read More »

राजधानी एक्सप्रेस रेल्वे गाडीला पहाटे लागली आगः उच्चस्तरीय चौकशीचे आदेश जीवीतहानी मात्र कोणतीही नाही

मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात रविवारी पहाटे तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला भीषण आग लागली. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६८ प्रवाशांना घेऊन जाणारा डबा १५ मिनिटांत रिकामा करण्यात आला आणि यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिरुवनंतपुरमहून दिल्लीला जाणाऱ्या १२४३१ क्रमांकाच्या ट्रेनच्या बी-१ डब्यात पहाटे ५.१५ च्या सुमारास आग …

Read More »

राहुल गांधी यांची परखड मागणी, मोदी जी देश आपसे कुछ सवाल पुछ रहा है, जवाब दो धर्मेद्र प्रधान यांना मंत्रिपदावरून काढून टाका

वैद्यकीय प्रवेशासाठी महत्वाची असलेल्या नीट परिक्षा २०२६ च्या पेपर लीक झाल्याने संपूर्ण देशभरातील २२ लाख तरूणांचे भविष्य वाया गेले. या प्रकाराने संपूर्ण देशभरातून एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे. या परिक्षेचा पेपर फुटल्याने आता हि परिक्षा या चालू महिन्यात होणार नाही तर ती पुढील महिन्यात होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, येत्या पाच वर्षात महाराष्ट्रातील प्रत्येक बेघराला पक्के घर पुढील वर्षी १५ लाख बेघरांना चाव्या सुपुर्द करणार

महाराष्ट्राला एका वर्षात ३० लाख घरांचे उद्दिष्ट मिळाले असून, हा देशातील आतापर्यंतचा उच्चांक आहे. घरांसाठी नऊ हजार कोटी मिळाले आहेत. ३० लाख घरांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत अत्यंत गतीने काम करत पाच लाख बेघर लोकांना घरांच्या चाव्या सुपुर्द करत आहोत. पुढील वर्षी १५ लाख लोकांना चाव्या सुपुर्द करु. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सर्वांना पक्की घरे या …

Read More »

वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी दिव्यांगांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिव्यांग सक्षमीकरण मंत्री अतुल सावे यांची माहिती

राज्य शासनाने विशेष सहाय्य अनुदान योजनांअंतर्गत लाभ घेणाऱ्या, परंतु वैश्विक ओळखपत्र नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अशा लाभार्थ्यांना वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या कालावधीत त्यांचे अनुदान सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी दिली. …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत द्या शेतकऱ्यांसाठीच्या धडक मोर्चात काँग्रेसचा सहभाग पण सरकारकडून मोर्चावर दडपशाही

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. मागील तीन महिन्यापासून या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी आंदोलन सुरु आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा निघाला असताना पोलिसांच्या मतदीने शेतकरी विरोधी भाजपा सरकारने अडवणूक केली पण सरकारच्या या दडपशाहीला आम्ही भिक घालत नाही, कोकणातील …

Read More »

जयंत पाटील यांची मागणी, कांद्याला किमान २००० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करा आणि नुकसान भरपाई द्या प्रति क्विंटल १५०० रुपये अनुदान द्या, जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कांद्याला किमान २००० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करावा आणि सध्याच्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रति क्विंटल १५०० रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली. आपल्या पत्रात जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील अग्रगण्य …

Read More »