Editor

तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांची डिलिमीटेशन प्रकरणी भूमिका सॉफ्ट ? अमित शाह यांच्याबरोबरील चर्चेवेळी जूनी भूमिका सोडल्याची चर्चा

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी एका आठवड्याच्या आत वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना मुद्द्यावर आपली कठोर भूमिका नरम केल्याचे दिसते. आणि १२ ऑगस्ट रोजी तामिळनाडू विधानसभेने संसदीय मतदारसंघांच्या पुनर्रचनेविरोधात एक बहुचर्चित ठराव मंजूर केल्यानंतर विरोधी पक्ष त्यांना सहजासहजी सोडण्याच्या मनःस्थितीत नाहीत. या वादाच्या केंद्रस्थानी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या विभागीय परिषदेच्या बैठकीत, …

Read More »

भारतातील इथेनॉलसाठी पाकिस्तानी साखर, साखर शुल्कमुक्त पाकिस्तानी शुगर मिल्स असोशिएशनला आशा द्विपक्षिय व्यापाराची

देशांतर्गत साखरेच्या किमतीत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने शुल्कमुक्त साखर आयातीला परवानगी दिल्यानंतर काही तासांतच, पाकिस्तानचा साखर उद्योग आपल्या अतिरिक्त साखरेच्या साठ्यासाठी भारताकडे संभाव्य बाजारपेठ म्हणून पाहत आहे. भारत-पाकिस्तान संबंधांमधील तणावपूर्ण परिस्थितीत ही घडामोड समोर आली आहे. पाकिस्तानस्थित दैनिक ‘द न्यूज इंटरनॅशनल’ने गुरुवारी वृत्त दिले की, पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशनच्या …

Read More »

पेलेट गनमुळे जखमी झालेल्या विद्यार्थ्यांसह राहुल गांधी यांचे पार्लमेंट स्ट्रीट पोलिस ठाण्यात आंदोलन एफआयआर घेण्यास मात्र दिल्ली पोलिसांचा नकार

शुक्रवारी दिल्लीतील ‘पार्लमेंट स्ट्रीट’ पोलीस ठाण्याबाहेर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एका ‘पेलेट-गन’ (छर्रे मारणाऱ्या बंदुकीच्या) हल्ल्यातील पीडितासोबत धरणे आंदोलन केले. पोलिसांकडून या प्रकरणात एफआयआर (FIR) नोंदवण्यास नकार दिला जात असल्याचा आरोप या पीडिताने केला होता. २० जुलै रोजी झालेल्या ‘जन झेड’ (Gen Z) आंदोलनादरम्यान पेलेट-गनच्या माऱ्यात जखमी झाल्याचा आरोप …

Read More »

अभिजीत दीपके यांचा आरोप, आजही काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जनावरांपेक्षा वाईट सुविधा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पुरेशा सुविधा नाहीत, तरीही विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी पाठवले जातेय

सरकारी शाळांच्या कथित दयनीय अवस्थेवरून कॉकरोच जनता पक्षाचे (सीजेपी) संयोजक अभिजित दीपके यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करताना म्हणाले की, योग्य वर्गखोल्या, बाक, शौचालये आणि सुरक्षित रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांशिवाय विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास भाग पाडले जात आहे. लातूरमधील एका जिल्हा परिषद शाळेला भेट देताना …

Read More »

महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय ग्रंथाचा सात भाषांमध्ये अनुवाद करणार सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांची घोषणा

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनातर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समग्र वाङ्मयाचा ग्रंथ हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगु, बंगाली आणि गोर बंजारा या सात भाषांमध्ये अनुवाद करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत हिंदी, सिंधी, गुजराती, …

Read More »

महाराष्ट्राच्या पशुवैभवाचा राष्ट्रीयस्तरावर दुहेरी सन्मान 'उमरडा' गाईला स्वतंत्र देशी गोवंश, तर माडग्याळ मेंढी प्रजातीला राष्ट्रीय स्तरावर मान्यता

महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या उमरडा या गाईला स्वतंत्र देशी गोवंश म्हणून, तर ‘माडग्याळ’ प्रजातीच्या मेंढीला राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र व अधिकृत प्रजाती (ब्रीड) म्हणून मान्यता मिळाली आहे. यामुळे राज्यातील उमरडा या स्थानिक गोवंशाचे व माडग्याळ या मेंढी प्रजातीचे संवर्धन, जतन व आनुवंशिक सुधारणा कार्यक्रमांना मोठी चालना मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने …

Read More »

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या २,४२१ पदांसाठी मेगाभरती ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ‘पवित्र’ पोर्टलद्वारे वर्ग ३ संवर्गातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) अशी एकूण २,४२१ रिक्त पदे भरण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेमुळे राज्यातील हजारो पात्रधारक उमेदवारांना सुवर्णसंधी …

Read More »

अंबाझरी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन मनपाला सहकार्य करणार अंबाझरी तलावाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी

नागपूरचे वैभव म्हणून अंबाझरी तलावाकडे पाहिले जाते. पाण्याची व्यवस्था नव्हती तेव्हा नागनदीवरील धरण किंवा साठवण तलाव म्हणून याकडे पाहिले जायचे. अनेक वर्ष या तलावाने पिण्याचे पाणी नागपूर शहराला दिले. मध्यंतरी जलपर्णीने हा तलाव व्यापला होता. मात्र, महानगरपालिकेने जलपर्णी नामशेष करण्यासाठी प्रयत्न केले व ते अत्यंत यशस्वी झाले आहेत. एक उत्तम …

Read More »

राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंच्या पुण्यात २२ ऑगस्टला राहुल गांधी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद ‘छात्रों की गुंज’ पक्षाचा नाही तर सर्वांसाठी खुला कार्यक्रम

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न हाती घेऊन छात्रों की गुंज हे देशव्यापी अभियान सुरु केले आहे. राजस्थानमधील कोटा मधून या अभियानाला सुरुवात करण्यात आली व डेहराडून व प्रयागराज नंतर चौथा कार्यक्रम महाराष्ट्रात होत आहे. राजमाता जिजाऊ यांनी ज्या पुणे शहरातून शिवाजी महाराज यांना स्वराज्याचे बाळकडू पाजले, क्रांतीज्योती सावित्रीमाई …

Read More »

गुलाबराव पाटील यांचे निर्देश, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समावेशनाचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या समितीकडे पाठवा कार्यरत कंत्राटी व बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांच्या समावेश करणार

जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत कार्यरत कंत्राटी व बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांच्या समावेशनाचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे सादर करावा, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कार्यरत कंत्राटी व बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत आयोजित बैठकीत मंत्री गुलाबराव …

Read More »