Editor

अहिल्यानगरमधील चौंडी येथील एक दिवसाच्या मंत्री परिषदेच्या बैठकीसाठी २ कोटींचा खर्च सर्व मोठी पंचतारांकित हॉटेल्स आणि सरकारी विश्रामगृहे आधीच बुक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त महायुती सरकारने मंगळवार, ६ मे रोजी अहिल्यानगर येथील चौंडी येथे मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी अहिल्यानगरमधील सर्व सरकारी विश्रामगृहे आणि खाजगी हॉटेल्स दोन दिवस आधीच बुक करण्यात आली आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह ३६ …

Read More »

गृह मंत्रालयाचे आदेश, सर्व राज्यांमध्ये मॉक ड्रिलचा सराव करवून घ्या नागरिकांना बचावाचे आणि नागरी संरक्षणासाठीही करा

गेल्या महिन्यात झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, गृह मंत्रालयाने (एमएचए) अनेक राज्यांना ७ मे (बुधवार) रोजी प्रभावी नागरी संरक्षणासाठी अर्थात मॉक ड्रिलचा सराव करण्यास सांगितले आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉक ड्रिल सरावा दरम्यान, हवाई हल्ल्याचे इशारा देणारे सायरन सक्रिय …

Read More »

प्रताप सरनाईक यांचे निर्देश, निधी वापराबाबत नियमावली करा परिवहन विभागातील अधिकाऱ्यांना दिले निर्देश

रस्त्यावरील होणारे अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेला अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे. यासाठी  रस्ता  सुरक्षा  निधीतून  प्राधान्याने घेण्यात येणाऱ्या कामांसह निधी वापराबाबत नियमावली तयार करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती कक्षात रस्ता सुरक्षा निधीबाबत, ऑटो-रिक्षा व मिटर्स टॅक्सी भाडे नाकारण्याच्या तक्रारीसंदर्भात …

Read More »

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारत भेटीचे निमंत्रण स्विकारले फोन वरून पहलगाम हल्ल्याचा केला निषेध

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारत भेटीचे निमंत्रण स्वीकारले, असे क्रेमलिनने सोमवारी सांगितले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना आमंत्रित केले. या वर्षाच्या अखेरीस दोन्ही देशांमधील वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारताला भेट देतील अशी अपेक्षा आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, अक्षय शिंदे चकमकीच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करा महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांना दिले आदेश

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (५ मे २०२५) महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना (डीजीपी), ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील दोन बालवाडी शाळेतील मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदेच्या चकमक अर्थात एनकांऊटरप्रकरणी चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती बेला एम. त्रिवेदी आणि न्यायमुर्ती पी.बी. वराळे यांच्या खंडपीठाने राज्य …

Read More »

रमेश चेन्नीथला यांचा आरोप, भाजपा, रा. स्व. संघाचे धर्माच्या नावावर विष पसरविण्याचे काम जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल: हर्षवर्धन सपकाळ

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वात प्रथम देशात सद्भावना यात्रेची सुरुवात केली. हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रात सद्भावना यात्रा सुरु केली आणि पहिल्याच यात्रेच्या घोषणेनंतर एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जाती धर्माच्या नावावर देशात विष पसरवून दुही माजवण्याचे काम करत आहे. म्हणून सद्भावना वाढीस लागावी यासाठी …

Read More »

बारावी परीक्षेच्या निकालात उत्तीर्ण मुलांपेक्षा ५ टक्के मुलींची संख्या जास्त राज्याचा निकाल ९१.८८ टक्केः यशस्वी विद्यार्थ्यांचे मंत्री दादाची भुसे यांच्याकडून अभिनंदन

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेत यश मिळविलेले विद्यार्थी, त्यांचे पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर देशाचे भविष्य असलेल्या या विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षा ११ फेब्रुवारी …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी आर गवई यांच्या खंडपीठासमोर होणार वक्फ कायद्याची सुनावणी मुख्य सरन्यायाधीश संजीव खन्ना १३ मे रोजी होणार निवृत्त

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश (CJI) संजीव खन्ना यांनी सोमवारी (५ मे, २०२५) सांगितले की, वक्फ (सुधारणा) कायदा, २०२४ ला आव्हान देणाऱ्या याचिका १३ मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे वक्फ कायदा प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती बी.आर. गवई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सूचीबद्ध केल्या जाणार असल्याचे सांगितले. कार्यवाहीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना म्हणाले …

Read More »

सीबीएसई बोर्डाच्या १० वी आणि १२ वी परिक्षेचा निकाल कधी लागणार २ मे रोजी लागणार असल्याची माहिती खोटी सीबीएसई बोर्डाची माहिती

२०२५ च्या सीबीएसई बोर्डाच्या निकालांची वेळ जवळ येत असताना, सोशल मीडियावर चुकीच्या माहितीचा वर्षाव होत आहे. बनावट पत्रे आणि दिशाभूल करणाऱ्या घोषणा प्लॅटफॉर्मवर पसरत आहेत, ज्यामुळे ४२ लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. २ मे २०२५ रोजी लिहिलेल्या अशाच एका पत्रात सीबीएसई दहावीचे निकाल ६ मे …

Read More »

महत्वाच्या शहरांमधून स्विगीची सेवा गायब अनेक शहरांमध्ये तात्पुरते गायब असल्याचा मेसेज मोबाईलवर दाखवतो

स्विगीने बहुतेक भारतीय शहरांमध्ये त्यांची पिकअप-अँड-ड्रॉप सेवा, ‘स्विगी जिनी’ शांतपणे बंद केली आहे. जवळजवळ ७० ठिकाणी उपलब्ध झाल्यानंतर, ही सेवा आता बेंगळुरू, मुंबई आणि दिल्ली एनसीआर सारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये स्विगी अॅपवरून गायब झाली आहे. ज्या काही ठिकाणी जीनी अजूनही दिसते, तिथे ती “तात्पुरती अनुपलब्ध” म्हणून दिसून येते. एप्रिल २०२० मध्ये …

Read More »