Editor

मंत्रालय प्रवेशासाठीच्या एफआरएस तंत्रज्ञानामुळे सुरक्षितता, पारदर्शकतेमध्ये होणार वाढ फेसरिडींगनंतरच प्रवेश मिळणार मंत्रालयात

मंत्रालयामध्ये प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या फेस डिटेक्शनवर आधारित एफआरएस तंत्रज्ञानामुळे मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होण्याबरोबरच शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता आणि गती येण्यात मदत होणार आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी या सर्वांनी या प्रणालीसाठीची आवश्यक नोंदणी करून घ्यावी, जेणेकरून सर्वांचा प्रवेश सुलभ होईल, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. या प्रणालीमुळे मंत्रालयात …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, आदिवासींच्या आरोग्यासाठी सर्वसमावेशक आरोग्य धोरण पारंपारिक आदिवासी उपचार व आधुनिक वैद्यकाचा एकात्मिक उपयोजन महत्वपूर्ण

एम्स येथील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत आदिवासींच्या आरोग्याबाबत झालेले तज्ज्ञांचे विचारमंथन अधिक मोलाचे आहे. याबाबत आता पुढचे पाऊल म्हणून परिषदेतील उपस्थित झालेले प्रश्न, त्याची असलेली उत्तरे, तज्ञांच्या सूचना याला अधोरेखित करून आरोग्य विद्यापीठ, एम्सच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनातर्फे सर्वसमावेशक असे आरोग्यधोरण केले जाईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची टीका, संघीय अर्थसंकल्प… एक आर्थिक लॉलीपॉप अर्थसंकल्पातील १२ लाख रूपयांच्या कर सवलतीवरून केली टीका

केंद्रीय वित्तीय मंत्री निर्मला सीतारामण यांनी नुकताच संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात १२ लाख रूपयांचे कर प्राप्त असलेले उत्पन्न करमुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर यासंदर्भात विरोधकांकडून टीका-टीपण्णीही सुरु झाली. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर अर्थसंकल्पावर म्हणाले की, संघीय अर्थसंकल्प २०२५, विशेषतः १२ लाख रुपयांचा आयकर …

Read More »

राज ठाकरे यांनी यांची स्पष्टोक्ती,… आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार विश्व साहित्य संमेलनाला हजेरी लावत व्यक्त केल्या भावना

मागील काही वर्षापासून मनसे प्रमुख राज ठाकरे हे राज्याच्या राजकारणातील महत्वाचं नाव, पण त्यांच्या वाक्यचार्तुर्याचे आणि हजरजबाबीचे नेहमीच मराठी भाषिकांमध्ये कौतुक केले जाते. पुण्यात आयोजित विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित राहिले. यावेळी त्यांच्यासमवेत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे ही हजर होते. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी …

Read More »

निवडणूक कारभार आणि संशयातीत प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी काँग्रेसची ईगल समिती महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीतील मतदार यादीच्या घोळासह, आगामी आणि पूर्वीच्या निवडणूकांचा अभ्यास करणार

काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीपाठोपाठ विधानसभा निवडणूका झाल्या. लोकसभा निवडणूकीत राज्यात काँग्रेस पक्षाला चांगल्यापैकी यश मिळाले. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूकीत अपेक्षे इतके यश काँग्रेसला मिळू शकले नाही. त्यातच विधानसभा निवडणूकीच्या मतदानाच्या दिवशी वाढलेल्या मतांच्या वाढीव टक्केवारीवरून सातत्याने संशय व्यक्त करण्यात येत असून या निवडणूकीसह यापूर्वी झालेल्या निवडणूका आणि आगामी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महानुभाव पंथाच्या सर्व श्रद्धास्थळांचा विकास करणार हदगाव येथील पुरातन श्रीकृष्णदेव उखळाई मंदिर नवपर्व व कलशारोहण सोहळा

पुढील पाच वर्षामध्ये महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रध्दास्थळांचा विकास करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. काही ठिकाणी विकास कामांना सुरुवात झाली आहे, उर्वरित ठिकाणी लवकरच कामे सुरु होतील,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. नांदेड जिल्ह्यातील महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हदगाव येथील गुरुवर्य बापू नगर परिसरातील श्रीकृष्ण देव …

Read More »

निर्मला सीतारामण म्हणाल्या, मध्यमवर्गाचा आवाज ऐकाला…रूपया फक्त डॉलर समोरच… नोकरशहांना पटवून देण्यात वेळ लागला

नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी देशातील १२ लाख रूपयांपर्यंतचे उत्पन्न कमावणाऱ्या मध्यमवर्गीयांना त्याचे उत्पन्न करमुक्त केल्याची घोषणेसह आर्थिक बाबींवर आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले की, अब्राहम लिंकनचे उदाहरण देत म्हणाल्या …

Read More »

जयराम रमेश यांची अर्थसंकल्पावर टीका, मनरेगाकडे दुर्लक्ष अर्थसंकल्पात मनरेगासाठी कमी तरतूद केली म्हणून केली टीका

देशाचा अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात गेल्यावर्षी प्रमाणे मनरेगाच्या निधीत कोणतीही नियोजित प्रमाणाऐवजी ती कमीच ठेवल्याने काँग्रेसचे प्रसारमाध्यम प्रमुख जयराम रमेश यांनी सरकार आणि अर्थसंकल्पावर टीका केली. यावेळी जयराम रमेश म्हणाले की, या महत्त्वाच्या सुरक्षा जाळ्याकडे “दुर्लक्ष” केल्याने ग्रामीण उपजीविकेबद्दलची सरकारची उदासीनता उघड होते असा आरोपही यावेळी केला. …

Read More »

अर्थसंकल्पानंतर पंतप्रधान मोदींचा नवा दावा, भाजपाच फक्त मध्यमवर्गीयांची काळजी करते विधानसभा निवडणूकीच्या भाजपा प्रचाराच्या शेवटच्या सभेत केली घोषणा

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ तारखेला मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाच्यावतीने आयोजित निवडणूक प्रचाराच्या आजच्या शेवटच्या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितीत लावली. त्यावेळी आर के पुरम येथील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना कालच्या केंद्रीय अर्थसंकल्पात १२ लाखापर्यंतचे उत्पन्न कर मुक्त असल्याच्या घोषणेची आठवण दिल्लीकरांना करून देत …

Read More »

राज्यपालांच्या उपस्थितीत तटरक्षक दलाचा ४९ वा स्थापना दिन साजरा जगातील चौथ्या क्रमांकाचे तटरक्षक दल भारताचे

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय तटरक्षक दलाचा ४९ वा स्थापना दिवस मुंबई येथे साजरा करण्यात आला. या प्रसंगी तटरक्षक दलाच्या विस्तार योजनेचे कौतुक करताना १५१ हून अधिक जहाजे, ७८ विमान आणि ४६ प्रगत रडार स्थानकांसह, भारतीय तटरक्षक दल जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे तटरक्षक दल झाले असल्याचे …

Read More »