राज्यातील मोठ्या शहरांमध्ये फोफावणाऱ्या अंमली पदार्थांच्या जाळ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली आहेत. व्हिसा संपल्यानंतरही बेकायदेशीरपणे राहणाऱ्या आणि ड्रग्ज तस्करी करणाऱ्या विदेशी नागरिकांना शोधून काढण्यासाठी आता ‘डायनॅमिक इमिग्रेशन सिस्टीम’ कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे प्रश्नोत्तराच्या तासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. आमदार स्नेहा दुबे यांनी राज्यातील अंमली पदार्थांच्या विक्रीबाबत उपस्थित केलेल्या …
Read More »आमदार विलास तरे यांचा विधानसभेत सीडी देत अंमली पदार्थ विक्रीचा केला भांडाफोड मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले चौकशी व कारवाईचे आदेश
वसई विरार शहर हद्दीत मोठ्या प्रमाणावर दिवसाढवळ्या खुलेआम अंमली पदार्थांची विक्री होत असल्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाश्वभूमीवर विधानसभेत तारांकित प्रश्न क्र. २४५६९ उपस्थित करत विधानसभा अध्यक्षांच्या माध्यमातून मुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांना सीडी देत अंमली पदार्थ विक्रीचा भांडा फोड केला असून त्यावर मंत्र्यांनी चौकशी करून कारवाई चे आदेश दिले …
Read More »राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर साहित्य अकादमीतर्फे २०२५चे पुरस्कार जाहिर
साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या २०२५ या वर्षासाठी प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशातील मान्यताप्राप्त २४ भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींना यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले असून मराठी भाषेतील ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथेसाठी लेखक राजू बाविस्कर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमी ही भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत स्वायत्त राष्ट्रीय संस्था असून …
Read More »प्रताप सरनाईक यांची स्पष्टोक्ती, सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास विधानसभेत दिली माहिती
एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानभवन येथे महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत कर्मचारी संघटनांनी मांडलेल्या तक्रारी व मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्या टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्यात आले. तसेच एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना यापुढे पत्नीसह वर्षभर …
Read More »द केरला 2 स्टोरीचा तो व्हिडिओ पालघरच्या चित्रपटगृहात शूट केलेला खासदार सय्यद नसीर हुसेन यांनी व्यक्त केला
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील असल्याचा दावा करणाऱ्या एका व्हिडिओमुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत, ज्यामध्ये चित्रपटगृहातील लोक घोषणाबाजी करत आहेत आणि मुस्लिमांवर सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार टाकण्याची शपथ घेत आहेत. हा व्हायरल व्हिडिओ १० मार्च, २०२६ रोजी वसईतील एका चित्रपटगृहात चित्रित करण्यात आला होता, या काँग्रेस खासदाराच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना, मीरा-भयंदर वसई-विरार …
Read More »ममता बॅनर्जी म्हणाल्या, दिल्लीचा लाडू जिंकू शकणार नाही भवानीपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बँनर्जी विरूद्ध सुवेंद्रू अधिकारी यांच्यात लढत
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा सामना कोलकाताच्या भवानीपूर मतदारसंघात विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्याशी होणार आहे. त्यामुळे २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत एक रोमांचक लढत अपेक्षित आहे. तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी स्वतः या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करताना ही घोषणा केली. या निवडणुकीत ममता बॅनर्जी सलग चौथ्यांदा …
Read More »केंद्र सरकारचे आवाहन, इंधन आणि एलपीजी अंशत पूर्ववत पीएनजी (PNG) हा एलपीजी (LPG) सिलिंडरपेक्षा अधिक स्थिर पर्याय
लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस अर्थात एलपीजी च्या संभाव्य तुटवड्याबद्दल वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने सोमवारी या इंधनाचा वापर करण्याचे आवाहन केले आणि पाईपद्वारे नैसर्गिक वायू अर्थात पीएनजी च्या पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करण्याचे संकेत दिले. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव (विपणन आणि तेल शुद्धीकरण) सुजाता शर्मा म्हणाल्या की, घरगुती …
Read More »इस्रायलचा दावा सुरक्षा अधिकारी अली लारीजानी यांचा हल्यात मृत्यू अयातुल्ल्ल्ला खामेनी यांचे सुरक्षा रक्षक म्हणून ओळखले जात
इराणच्या सुरक्षा धोरणाचे सुकाणू सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती आणि इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामोनी यांचे सुरक्षा सल्लागार म्हणून काम पाहणारे अली लारीजीनी यांनी संघर्षादरम्यान तेहरानचा चेहरा बनले होते, त्या अली लारीजानी यांचा इस्रायली हल्ल्यांमध्ये मृत्यू झाला, असे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी मंगळवारी सांगितले. या घटनेमुळे इराणी नेतृत्वाला आणखीच …
Read More »धार्मिक स्वातंत्र्य विधेयकावरून वादळी चर्चा, सभागृहाचे कामकाज तहकूब जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांचा गोंधळ
कुठल्या पद्धतीने धर्मांतर होतं तर ज्याच्यामध्ये अमिष असेल, जबरदस्ती असेल, त्या ठिकाणी फसवणूक असेल, बळजबरी असेल, लबाडी असेल किंवा अल्पवयीन अशा पद्धतीचं धर्मांतरण असेल. गैरवाजवी प्रभाव असेल अशा धर्मांतरणाला बेकायदेशीर धर्मांतरण ठरवण्यात आलेल आहे. या पद्धतीनं केलेलं कुठलंही धर्मांतरण हेच फक्त या ठिकाणी बेकायदा धर्मांतरण होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »उद्धव ठाकरे यांचा सवाल, गॅस टंचाई नाही म्हणता… मग रांगा कशासाठी? गॅस पुरवठ्यावरून राज्य सरकारला केला सवाल
राज्यात एलपीजी गॅसचा कोणताही तुटवडा नाही असा दावा सरकार करत असताना प्रत्यक्षात मात्र नागरिकांना गॅस सिलिंडरसाठी रांगा लावाव्या लागत आहेत. या विरोधाभासावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “गॅस टंचाई नाही म्हणता, तर मग लोक सिलिंडरसाठी रस्त्यावर रांगा का लावत आहेत?” असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी सरकारला …
Read More »
Marathi e-Batmya