मुंबई विकण्याचा भारतीय जनता पक्षाचा सपाटा सुरुच असून महानगरपालिकेच्या सत्तेची चावी हाती येताच मुंबईतील मोक्याचे भूखंड विकण्यास सुरुवात झाली आहे. वरळीतील महत्वाच्या ठिकाणी असलेला ५१६६ चौरस मीटरचा भूखंड अवघ्या ४५५ कोटी रुपयांत लाडक्या बिल्डरचा देण्याचा घाट घातलेला आहे. हा व्यवहार महापालिकेचे नुकसान करणारा असून बिल्डर व सत्ताधाऱ्यांचे खिसे भरणारा आहे. …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, विनग्रुपच्या प्रकल्पामुळे आधुनिक, एकात्मिक शहरी विकासाला चालना व्हिएतनामच्या कंपनीची महाराष्ट्रात ८.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक; उद्योग विभाग व ‘एमएमआरडीए’ यांच्यासोबत सामंजस्य करार
शाश्वत नागरी विकास, औद्योगिक व पर्यटन वृद्धी, नवीकरणीय ऊर्जा क्षमता आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात व्हिएतनाममधील विन ग्रुप जॉईंट स्टॉक कंपनी महाराष्ट्रात सुमारे ८.५ अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. यासंदर्भात विन ग्रुप कंपनीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सोबत सामंजस्य करार केला. विन ग्रुप कंपनीच्या गुंतवणुकीमुळे …
Read More »आमदार रईस शेख यांची मागणी, वरळीच्या भूखंडाचा लिलाव सरकारची चौकशी होईपर्यंत थांबवा समाजवादी पक्षाचे आमदार शेख यांचे महापौर रितू तावडे आणि आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र
बृहन्मुंबई महानगरपालिकेने वरळीतील एका मोक्याच्या भूखंडाचा लिलाव करण्यासाठी निविदा काढल्या असून त्यावरील चाचणी प्रयोगशाळेच्या पुनर्विकासातील अनियमिततेची राज्य सरकारकडून चौकशी पूर्ण होईपर्यंत लिलाव थांबवण्यात यावा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. आमदार रईस शेख यांनी त्यासंदर्भात मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि आयुक्त अश्विनी भिडे यांना …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर-(MRSAC) आता कंपनी, महाराष्ट्र जिओटेक्नॉलॉजी अॅप्लिकेशन सेंटर-महाजिओटेक कंपनी स्थापन होणार, महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (MRDP) राबविण्यास मंजुरी, महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (MRDP) राबविण्यास मंजुरी, महाराष्ट्रात नवीन इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दीमत्ता विभाग आदी निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले …
Read More »महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी – महावितरणची आर्थिक पुनर्रचना महावितरणचा आयपीओ येणार ; कृषि वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र वितरण कंपनी
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) कंपनीचे औद्योगिक, वाणिज्यिक, घरगुती व इतर सर्व बिगर कृषि ग्राहकांसाठीची वितरण संस्था आणि कृषि ग्राहकांना वीज पुरवठा व संबंधित सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एमएसईबी सोलार ॲग्रो पॉवर लिमिटेड (एमएसएपीएल) असे विभाजन करून दोन स्वतंत्र कंपन्या स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, फडणवीसांनी केलेले विधान म्हणजे ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण’ बारामती पोट निवडणूकीवरुन केली टीका
“बारामती विधानसभेची पोटनिवडणूक जनभावना लक्षात घेऊन बिनविरोध व्हायला हवी” हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान म्हणजे ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण’, असे आहे, असा सणसणीत टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, …
Read More »मुंबईतून मतदानासाठी केरळला जाणाऱ्या नागरिकांच्या बसला हर्षवर्धन सपकाळ यांनी दाखवला झेंडा मतदान लोकशाहीतील उत्सव, जास्तीत जास्त मतदान करण्याचा प्रयत्न करा: हर्षवर्धन सपकाळ
देशातील चार राज्ये व एका केंद्रशासीत प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होत असून ९ तारखेला केरळमध्ये मतदान होत आहे. मुंबईतील केरळचे नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आज आपल्या गृहराज्यात रवाना झाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी मुंबईतून केरळला जाणाऱ्या बसला हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार अमिन पटेल व काँग्रेस पदाधिकारी …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, शालेय सहलींतून एसटीला १२७ कोटींचे उत्पन्न विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीतून १२७ कोटी १८ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शालेय सहलींसाठी २५ हजार ५५८ बस फेऱ्यांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करत तब्बल १२७ कोटी १८ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. हे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत ३३ कोटी २९ लाखांनी अधिक असून, “शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित सहलींसाठी एसटीशिवाय पर्याय नाही,” असे …
Read More »अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांची माहिती, राज्यात पेट्रोलियम पदार्थांचा पुरेसा साठा एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाची व्यापक उपाययोजना
राज्यात पीएनजी जोडण्यांची संख्या २५.३६ लाखांवर पोहोचली असून एका महिन्यात ७३ हजार नवीन जोडण्या देण्यात आल्या आहेत. सीजीडी पाईपलाईनसाठी ‘Deemed Permission’ देण्याचा निर्णय घेतल्याने नेटवर्क विस्ताराला गती मिळणार आहे. ज्या ठिकाणी पीएनजी नेटवर्क पोहोचलेले आहे त्याठिकाणी ग्राहकांनी त्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या भागांमध्ये पीएनजी पाईपलाईन टाकणे शक्य नाही त्या ठिकाणी एलपीजीचा …
Read More »अजितदादांच्या अपघातादिवशी भोंदू अशोक खरातच्या मोबाईलवर आर्थिक व्यवहाराचे १९ मेसेज समता पतसंस्था व्यवहारांची चौकशी करा; अंजली दमानियांची मागणी
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या दिवशी भोंदू अशोक खरातच्या मोबाईलवर समता पतसंस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. दि. २७ ते ३१ जानेवारी या कालावधीत खरातच्या मोबाईलवर “समता पतसंस्थेकडून मोठ्या प्रमाणात एसएमएस आले होते. विशेष म्हणजे, २८ …
Read More »
Marathi e-Batmya