मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारने राज्य वीज नियामक कायद्यातील कलम ४ चा वापर करून तातडीने राज्यातील सर्व वीज देयकांना स्थगिती देऊन ३०० युनिट पर्यंतची वीज बिलं माफ करावीत अशी मागणी करत अदानी वीज कंपनीच्या कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. आज आमदार अतुल भातखळकर …
Read More »अनलॉक-२ मध्ये प्रवेश, नोव्हेंबरपर्यंत ८० कोटी लोकांना मोफत धान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू केल्याने काही प्रमाणात आपण या विषाणूला रोखू शकलो. आता आपण अनलॉक-२ मध्ये प्रवेश केला आहे. तसेच ही परिस्थिती आणखी काही काळ अशीच राहणार असल्याने येत्या नोव्हेंबर पर्यत देशातील ८० कोटी गरीब, गरजू, कामगार असलेल्या नागरिकांना महिन्याला प्रति व्यक्ती मोफत ५ किलो …
Read More »काँग्रेसनेही विचारले आता पंतप्रधान मोदींना ७ प्रश्न चीनी कंपन्यांनी पीएम केअर्स फंडला दिला कोट्यवधींचा निधी : बाळासाहेब थोरात
मुंबई : प्रतिनिधी चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी करुन गलवान खोरे, पेंगॉग तलाव परिसर, हॉटस्प्रिंग व वाय जंक्शन भागात लष्कराची जमवाजमव केली. चीनी सैन्याच्या आगळीकीमुळे आपले २० जवान शहीद झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून चीन सीमेवर तणाव असताना अनेक चीनी कंपन्यांनी पंतप्रधान केअर्स फंडाला कोट्यवधी रूपयांचा निधी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »ज्यांचे डिपॉझिट जप्त झाले, त्यांच्या वक्तव्याची दखल घेण्याची गरज नाही शरद पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला
सातारा-मुंबई: प्रतिनिधी सांगली लोकसभा निवडणुकीत पराभव व बारामती विधानसभा निवडणुकीत ज्याचे डिपॉझिट जप्त झाले. त्यामुळे लोकांनी स्वतःहून त्यांना बाजूला केले असून त्यांच्या वक्तव्याची दखल घ्यावी इतके काही त्यांचे काम नसल्याचे सांगत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याची दखल घेण्याची गरज नसल्याचे सांगत ते अदखलपात्र असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. सातारा …
Read More »मंत्री भुजबळांच्या या मागणीला दानवेंच्या मंत्रालयाने दिली परवानगी जास्तीच्या मका खरेदीला दिली परवानगी
नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी राज्यात मका धान्याची खरेदी करूनही आणखी मका शिल्लक असल्याने त्याची वाढीव खरेदी करण्यास केंद्राने मान्यता द्यावी अशी मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्राकडे केली. त्यावर केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने त्यास तातडीने मान्यता दिली. विशेष म्हणजे केंद्राच्या या मंत्रालयाचे भाजपा नेते …
Read More »शेतकऱ्यांना कर्जवाटप करा अन्यथा सोमवारपासून भाजपाचे आंदोलन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा इशारा
मुंबई: प्रतिनिधी पावसाळा सुरू झाला तरी खरीप हंगामासाठीचे शेतकऱ्यांचे कर्जवाटप ठप्प आहे. शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन ताबडतोब पीककर्जाचे वाटप सुरू करावे, कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी सोमवारपासून राज्यात ठिकठिकाणी “कर्जमाफी करा, पीक कर्ज द्या,” आंदोलन करणार असल्याचा इशारा …
Read More »कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जातेय, मृतकांच्या संख्येत पारदर्शकता नाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विरोधी पक्षनेते फडणवीसांनी केली लक्ष देण्याची मागणी
मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेलीय. ऑक्सीजन न मिळाल्यामुळे कोरोनारूग्णांचा मृत्यू ही त्याचेच द्योतक असून आजही या विषाणूमुळे मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत अजूनही पारदर्शकता नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत या गोष्टींकडे लक्ष देण्याची मागणी आज पत्र पाठवित मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. १९ जून २०२० रोजी …
Read More »भाजपा देणार कोकणवासियांना पत्रे, सौर कंदिलासह या गोष्टी प्रदेशाध्यक्षांचे नागरिकांना सहभागाचे आवाहन
मुंबई: प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोकणातील बांधवांना थेट मदत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने निर्धार केला असून या कामात नागरिकांनी पक्षाला साथ द्यावी, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. चंद्रकांतदादा पाटील यांनी नागरिकांना पाठविलेल्या खुल्या पत्रात म्हटले आहे की, भाजपाने तातडीची मदत म्हणून कोकणवासियांसाठी काही गाड्या भरून साहित्य मुंबईतून …
Read More »विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे कोणत्या मागण्या केल्या..वाचा मदतीच्या निकषांमध्ये बदल, मासेमारांसह शेतकर्यांना कर्जमाफी द्या!
मुंबई : प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेत कोकण दौर्याच्या अनुषंगाने तेथील अडचणींच्या १९ मागण्यांचे एक निवेदन त्यांना सादर केले. देवेंद्र फडणवीस यांनी गेले दोन दिवस कोकणाचा दौरा करून स्थानिकांशी संवाद साधला. अनेक ठिकाणांना भेटी देऊन नुकसानीचा …
Read More »फडणवीस म्हणाले, सरकारने पॅकेज जाहीर केले पण त्याचा फायदा नाही कोकणातील परिस्थितीबाबत सर्वंकष निवेदन सरकारला देणार
दापोली: प्रतिनिधी आज सरकारचे अस्तित्त्व जमिनीवर दिसत नाही. केलेल्या घोषणा प्रत्यक्षात उतरताना दिसत नाही. कुठलीही आपत्ती आपण थांबवू शकत नसलो तरी पण, त्याला प्रतिसाद कसा दिला, हे महत्त्वाचे असते. राज्य सरकारने पॅकेज जाहीर केले. पण, त्याचा फायदा होणार नाही. मासेमारांसाठी त्यात काहीही नाही. मी अनेक कोळीवाड्यांना भेटी दिल्या. डिझेलचा परतावा …
Read More »
Marathi e-Batmya