मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारकडून प्राप्त होत असलेल्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य मिशनची अंमलबजावणी राज्य सरकारमार्फत करण्यात येते. या सेवेत कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली सुमारे ४०० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची तक्रार विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवून केली असून याची चौकशी करण्याची मागणीही केली. …
Read More »पवारांचे आश्वासन एसटी कर्मचाऱ्यांना, पण निधीसाठी परिवहन मंत्री भेटणार पुन्हा अर्थमंत्र्यांना दिवाळीपूर्वी थकित वेतन मिळावे यासाठी संघटनेच्या नेत्यांनी केली शरद पवारांशी चर्चा
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात सर्वप्रथम लॉकडाऊन करण्यात आला. या लॉकडाऊन काळात सर्वच परिवहन सेवा बंद ठेवण्यात आली. त्यामुळे एसटी महामंडळाच्या तोट्यात आणखी वाढ झाली. त्यामुळे मागील पाच महिन्यापासून विनावेतन एसटी कर्मचारी काम करत आहेत. मध्यंतरी अर्थमंत्री अजित पवार यांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी भेटून एक महिन्याच्या पगाराची …
Read More »तांत्रिक अडचणीमुळे मराठा आरक्षणाच्या सुणावनीवेळी वकील गैरहजर घटनापीठाचे गठन करण्याची मागणी पुन्हा करणार- अशोक चव्हाण
मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने तातडीने घटनापीठाचे गठन करून या आरक्षणाच्या अंमलबजावणीवरील तात्पुरती स्थगिती रद्द करण्याच्या अर्जावर सुनावणी करावी, अशी विनंती राज्य सरकारने यापूर्वीच केलेली आहे. आजच्या सुनावणीनंतर हीच विनंती पुन्हा एकदा व ताबडतोब केली जाणार असल्याचे मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले. सर्वोच्च न्यायालयातील …
Read More »कोरोना : मुंबईसह महानगर प्रदेश आणि पुण्यातील दैनदिन संख्या घटतेय ५ हजार ३६३ नवे बाधित, ७ हजार ८६३ बरे झाले तर ११५ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यात प्रामुख्याने कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येच्यादृष्टीने हॉटस्पॉट ठरत असलेल्या मुंबई महानगर प्रदेश आणि पुणे विभागातील संख्या आता चांगल्यापैकी नियंत्रित येत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईत आज ८०१ तर महानगर प्रदेशातील महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये २०० आणि ५० बाधित आढळून आले आहेत. तर पुणे विभागातील चार जिल्ह्यात एक हजाराच्या आतमध्ये बाधित …
Read More »मराठा आरक्षणाबाबत आघाडी सरकारच्या न्यायालयीन अपयशामुळे संपूर्ण राज्य वेठीला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला निषेध
कोल्हापूर : प्रतिनिधी राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही व हे सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही हे आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या घडामोडींमुळे दिसले. राज्य सरकारच्या अशा भूमिकेमुळे केवळ मराठा समाज नाही तर संपूर्ण महाराष्ट्र वेठीला धरला गेला आहे. महाविकास आघाडी सरकारचा …
Read More »शरद पवार, पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली हि ग्वाही स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाला बळकटी देणार
पुणे : प्रतिनिधी स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची नोंदणी करून विविध योजना राबविण्याबरोबरच महामंडळाचे लवकरच बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या संघटनांकडून विविध मागण्या व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत …
Read More »खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनो शैक्षणिक शुल्कात वाढ करु नका वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी कोविड -19 या काळात शासकीय रुग्णालये आणि महाविद्यालयांबरोबरच खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनीही सेवाभावी वृत्तीने काम केले. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यावर्षी विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शैक्षणिक शुल्कामध्ये कोणतीही वाढ करु नये असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आणि दंत महाविद्यालयाच्या संघटनेला केले. वैद्यकीय शिक्षण मंत्री …
Read More »लॉकडाऊनमधील कोणत्या कर्जदाराचे व्याज सरकार भरणार आणि अटी काय ? जाणून घ्या केंद्रिय वित्त विभागाने बँकाना हे आदेश
मुंबई: प्रतिनिधी विविध बँकांकडून देशातील सर्वसामान्य नागरिक आणि उद्योजक, विद्यार्थी यांनी बँकाकडून कर्ज घेतले. मात्र कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने सर्वच आर्थिक केंद्रे बंद ठेवण्यात आली. परंतु बँकाकडून घेतलेल्या कर्जावरील व्याज सातत्याने सुरु राहीले. त्यावर उपाय म्हणून अखेर या कर्जदारांवरील व्याजाचा भार हलका करण्यासाठी या कालावधीतील व्याज केंद्र …
Read More »शेतकऱ्यांच्या घरावर धाडी टाकून केंद्र सरकार नेमकं काम कुणासाठी करतंय ? मंत्री छगन भुजबळ यांचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी एकीकडे कांद्यावर निर्यात बंदी आणून केंद्र सरकारने अडचणीत आणले आणि दुसरीकडे कोरोना संकटकाळात कांदा उत्पादक अडचणीत सापडला असताना आयकर विभागाच्या धाडी टाकून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा डाव असून केंद्र सरकार नेमकं काम कुणासाठी करतंय असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा …
Read More »राज्यात कोरोना चाचण्यांचे आता हे सुधारीत दर राहणार चवथ्यांदा सुधारणा करण्यात आल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रती तपासणी सुमारे २०० रुपये कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी ९८०, १४०० आणि १८०० रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी …
Read More »
Marathi e-Batmya