Editor

संदीप सिंह-भाजप-ड्रग डील कनेक्शनची माहिती सीबीआयला देणार काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना गृहमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी संदीप सिंह -भाजप-ड्रग डील कनेक्शनची सखोल चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन केली. भारतीय जनता पक्षाचे हात सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील ड्रग कनेक्शनमध्ये गुंतलेले आहेत. ड्रग डीलसंदर्भात ज्याच्यावर आरोप आहेत त्या संदीप सिंहने …

Read More »

मुख्यमंत्री पुन्हा ‘फायली’वर- खाजगी रुग्णालयाच्या दरनियंत्रण आदेशाला तात्काळ मंजुरी द्या भाजपाचे आ. अतुल भातखळकर यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीत देशात क्रमांक एक वर असलेल्या महाराष्ट्र राज्यातील रुग्णांना खाजगी रुग्णालयांत माफक दरात उपचार मिळू शकणारा ‘दर नियंत्रण प्रस्ताव’ मुख्यमंत्र्यांकडे मागील ८ दिवसांपासून प्रलंबित ठेवण्यात आला असून मुख्यमंत्र्यांनी ‘फायलीवर’ न राहता या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी द्यावी अशी मागणी भाजपाचे आ. अतुल भातखळकर यांनी केली. मुळात एवढ्या मोठ्या महामारीला सामोरे जात असताना राज्य …

Read More »

वंचित आणि वारकऱ्यांच्या आंदोलनाला यश पण मंदिरे उघडणार ८ दिवसांनी अॅड. प्रकाश आंबेडकरांची माहिती

पंढरपूर-मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी केंद्र सरकारने अनलॉक-३ मध्ये परवानगी दिली. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील मंदिरे उघडण्यास परवानगी नाकारली. त्यानंतर भाजपाकडून याप्रश्नी आंदोलनही केले. परंतु राज्यातील वारकरी सांप्रदाय आणि वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पंढरपूरातील विठ्ठल मंदिर उघडावे यासाठी पुकारलेल्या आंदोलनाला यश आले असून विठ्ठल मंदीरासह राज्यातील सर्व …

Read More »

कोरोना: १५ दिवसात ४ हजाराहून अधिक मृत्यूमुळे संख्या २५ हजाराकडे १६ हजार ४०८ बाधित रूग्ण, ७ हजार ६९० तर २९६ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात मागील १५ दिवसात ४ हजार ३९९ जणांचा मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण मृतकांची संख्या २४ हजार ३९९ वर पोहोचत २५ हजारकडे जात आहे. त्यामुळे मृतकांचे प्रमाण महाराष्ट्रात जास्त असल्याचे दिसून येत आहे. यातील मृतकांची सर्वाधिक संख्या मुंबई आणि महानगर प्रदेश आणि पुणे विभागत जास्त आहे. एकट्या …

Read More »

केंद्राकडून अनलॉक-४ मध्ये सवलतींचा वर्षाव मात्र missionbeginagain वर शांतता ? निर्णयाची अंमलबजावणी करणार की संघर्ष

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमधून केंद्र सरकारकडून आता सवलती देण्यात येत असून अनलॉक-४ अंतर्गत सिनेमा थिएटर, सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमासाठी १०० नागरिकांच्या उपस्थितीसह मेट्रो प्रवासास परवानगी देण्याचा निर्णय घेत त्याविषयीची मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. तसेच राज्य सरकारांनी स्वतंत्र लॉकडाऊन जाहीर करण्यास अटकाव केला. यासंदर्भात राज्य सरकारकडून अधिकृत …

Read More »

गेलेले गड पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस लागली कामाला भाजपामध्ये गेलेल्या जुन्या सहकाऱ्यांना चुचकारण्याचे प्रयत्न सुरु

पुणे : प्रतिनिधी विविध जिल्ह्यातील आगामी महापालिका निवडणूका लक्षात घेवून कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या महापालिकांवर पुन्हा एकदा घड्याळ बांधण्यासाठी  राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार यांच्याकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यापार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूकीच्या काळात पक्षाला सोडून गेलेल्या अनेक जून्या सहकाऱ्यांना पुन्हा पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरु झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील …

Read More »

संदीपसिंह आणि भाजप, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’? सुशांतच्या आत्महत्येनंतर संदीपसिंहने कोणाला ब्रिफिंग केले? काँग्रेसचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी सुशांतसिंग राजूपत प्रकरणाचे धागेदोरे भाजपापर्यंत कसे पोहचत आहेत हे आता प्रकाशात येत आहे. मोदींचा बायोपीक बनवणाऱ्या संदीपसिंहचे नाव या प्रकरणात ड्रग संदर्भात जोडले गेले. हे पाहता संदिपसिंह, भाजप व ड्रग माफिया यांच्यातील संबंधावर प्रकाश पडत आहे. तसेच १४ जूनला सुशांतसिंगच्या आत्महत्येनंतर काही दिवसांतच संदीपसिंहने भाजपाच्या एका नेत्याला भेटून …

Read More »

राष्ट्रवादीने खड्डा सेल्फीचा “स्तुत्य उपक्रम” राबवून सरकारसमोर आरसा धरावा भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी गतवर्षी महाराष्ट्रात खड्डयांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी यावर्षी मुंबई- गोवा महामार्गावर हा “स्तुत्य उपक्रम” का राबवून आपल्या सरकारच्या चेहऱ्यासमोर का हा आरसा धरीत नाही? कोकणात जाणाऱ्या आमच्या चाकरमान्यांना का यावर्षी एवढे छळताय? संपूर्ण महामार्गाची दुर्दशा झालेली का दिसत नाही? कोकणी माणसाच्या सहनशीलतेला का नख लावताय? असा संतत्पत सवाल …

Read More »

घर खरेदी, जमिन व्यवहार आता ऑफिशियली स्वस्त: २०२१ पर्यत सवलत मुद्रांक शुल्क सवलतीचा शासन निर्णयाचे गॅजेट झाले प्रसिध्द

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झालेले असल्याने आर्थिक उलाढाल मंदावली आहे. यापार्श्वभूमीवर आर्थिक व्यवहारांना चालना देण्यासाठी राज्य सरकारने घर खरेदी, जमिन खरेदी-विक्री व्यवहारावर लागणाऱ्या मुद्रांक शुल्कावर सवलत देण्याचा निर्णय नुकताच घेतला. त्यानुसार आज त्यासंदर्भातील गॅजेट सरकारकडून प्रसिध्द करण्यात आले. राज्य सरकारच्या निर्णयानुसार १ सप्टेंबर २०२० पासून घर खरेदी-जमिन …

Read More »

अंतिम वर्षाच्या परीक्षा सहज व सुलभ पध्दतीने घेणार निर्णयासाठी कुलगुरूंची समिती गठीत- मंत्री उदय सामंत

मुंबई : प्रतिनिधी विद्यार्थ्यांना कोणत्याही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार नाही याची विशेष काळजी घेऊन  सहज, आणि सुलभ पध्दतीने अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा आणि कधी घेता  येतील यासाठी कुलगुरूंची समिती गठीत करण्यात आली आहे असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संगितले. आज मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत …

Read More »