Editor

कापूस खरेदीला सोमवारपासून सुरूवात सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

सातारा : प्रतिनिधी लॉडाऊनच्या काळात शेतकऱ्यांचा माल वाया जावू नये यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्याकडील कापसाची खरेदी राज्य सरकार कडून करण्यात येणार आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशसह संपूर्ण महाराष्ट्रात कापूस खरेदी केंद्रांमध्ये या कापसाच्या खरेदीला सोमवार २० एप्रिलपासून सुरुवात केली जाणार असल्याची …

Read More »

आरोग्य, पोलिस, होमगार्ड यांच्यासह अत्यावश्यक कर्मचाऱ्यांचे वेतन तात्काळ मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीतील निर्णयाची उपमुख्यमंत्री पवार यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी आरोग्यविषयक कामांची गरज लक्षात घेऊन चालू आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन योजनेचा २५ टक्के निधी आरोग्यविषयक कामांकडे वळवण्यात येणार आहे. तर आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण, पोलिस, होमगार्ड व इतर विभागातील अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन-मानधन तात्काळ अदा करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. कोरोनाच्यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी स्थापन मंत्रिमंडळ …

Read More »

मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनो गावी आहात तर जिल्हाधिकारी-पोलिसांशी संपर्क साधा कार्यालयीन मुख्यालयात हजर होण्याचे राज्य सरकारचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील लॉकडाऊनची मुदत दुसऱ्यांदा वाढविण्याआधीच मंत्रालयातील अनेक अधिकारी आपल्या मूळ गावी किंवा नातेवाईकांच्या गावी गेलेले आहेत. अशा गावी गेलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी तात्काळ मंत्रालयात हजर होण्यासाठी संबधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किंवा पोलिस अधिक्षकांशी संपर्क साधून मंत्रालयातील आपल्या जागेवर रूजू व्हावे असे आदेश राज्य सरकारने सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना बजावले आहेत. कोरोना …

Read More »

वीजपुरवठा खंडित झाला? मिस कॉल द्या किंवा ‘एसएमएस’ पाठवा ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांचे महावितरण विभागाला आदेश

मुंबई: प्रतिनिधी वीजग्राहकांना जलद व विश्वासार्ह सेवा देण्यास कटिबध्द असलेल्या महावितरणने वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी मोबाईलद्वारे मिस्ड कॉल व ‘एसएमएस’ अशी सहज सुविधा वीजग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात २२ मार्च ते ३ मे २०२० पर्यंत ‘लॉकडाऊन’ जाहीर झालेला आहे. त्यामुळे वीजग्राहकांना घरबसल्या वीजपुरवठा खंडित झाल्याची …

Read More »

व्यापाऱ्यांसाठी खुषखबर, दंडाशिवाय जीएसटी कर परतावा भरण्यास मुदतवाढ कर परतावा लवकर भरण्याचे वस्तु व सेवा कर विभागाचे आवाहन

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यापारी, व्यावसायिक संस्था बंद ठेवाव्या लागल्या. मात्र फेब्रुवारी २० ते २० मार्च अखेर पर्यंत विक्री केलेल्या मालावरील आणि सेवा व्यवसायावरील कर भरण्यासाठी वस्तु व सेवा कर विभागाने व्यापाऱ्यांना कर भरण्याच्या मुदतीत सूट दिली आहे. या कालावधीत कर भरणा करणाऱ्यांना …

Read More »

गंभीर आर्थिक परिस्थितीची शक्यता, अखर्चिक निधी परत जमा करा वित्त विभागाचे सर्व विभागाला आदेश

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूमुळे राज्यातील पुढील तीन महिने राज्याचे कर आणि करेतर उत्पन्न, महसूली जमा यावर परिणाम होवू अतिशय गंभीर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या सर्व विभागांनी खर्च काटकसरीने करावे असे आदेश वित्त विभागाने देत अनेक खर्चाच्या बाबी वित्त विभागाच्या परवानगीशिवाय करू नये आणि निधी खर्च झालेला नसेल …

Read More »

मालकानों, भाडेकरूंना घरभाड्याचा तगादा लावू नका राज्य सरकारची सर्व घरमालकांना सूचना

मुंबई: प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वच गोष्टी बंद स्वरूपात आहेत. त्यामुळे भाड्याने रहात असलेल्या अनेकांना घरभाडे देणे अशक्य होत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही भाडेकरूच्या पाठी घरभाड्यासाठी घरमालकांनी तगादा लावू नये असे आवाहन राज्य सरकारने केले असून घरभाडे वसूली तीन महिने पुढे ढकलावी अशी सूचनाही केली. लॉक़डाऊनमुळे सर्वच संस्था, बाजारपेठा, व्यावसायिक …

Read More »

मंत्रालयाचे कामकाज अधिकाऱ्यांच्या तीन तुकड्यांमध्ये सुरू होणार रोटेशन पध्दतीने कर्मचाऱी-अधिकारी उपस्थित राहून काम करणार

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनचा दुसऱ्या टप्प्या ३ मे पर्यत वाढविण्यात आलेला असला तरी केंद्र सरकारने ३५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शासकिय कार्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याधर्ती राज्यातील शासकिय कामकाज आणि जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी मंत्रालयासह विभागीय मुख्यालये ३५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून २० …

Read More »

उद्योगांना परवानगी मात्र मुंबई-पुणे-नागपूर महानगरात नाही २० तारखेपासून उद्योग सुरु होण्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे संकेत

मुंबई ; प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या भागातील बंद असलेले उद्योग सुरु करण्याबाबत उद्योजकांना परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्य सरकारने तयार केल्या नियमानुसार अर्थात जे कारखाने, उद्योग कामगारांच्या राहण्याची, प्रवासाची सोय करतील अशांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला असून त्या उद्योगांना सूटही देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे …

Read More »

लोककलावंताना राष्ट्रवादीकडून मदतीचा हात भटक्या विमुक्त जातीतील लोककलावंतांच्या खात्यात जमा होणार ३ हजार रुपये

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील भटक्या विमुक्त जातीतील लोककलावंतांच्या मदतीला राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट धावून आली असून प्रत्येक लोककलावंतांच्या खात्यात उद्यापासून (शुक्रवार) प्रत्येकी ३ हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे खजिनदार आमदार हेमंत टकले यांनी दिली. कोरोनाच्या संकटामुळे समाजातील अनेक वेगवेगळे घटक अडचणीत सापडले आहेत. स्थलांतरित मजुर असतील किंवा …

Read More »