Editor

राज्यात ५२ हजार कोरोनाग्रस्तांपैकी ३५ हजार रूग्ण अॅक्टीव्ह २ हजार ४३६ नवे रूग्ण, ६०जणांचा मृत्यू तर १५ हजार बरे होवून घरी

मुंबई: प्रधिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत कालच्या तुलनेत २ हजार ४३६ ने आज वाढ झालेली असली तरी प्रत्यक्षात ३५ हजार १७८ रूग्ण अॅक्टीव्ह आहेत. तसेच ११८६ जणांना आज घरी सोडण्यात आल्याने बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या १५ हजार ७८६ इतकी झाली असून ६० जणांचा २४ तासात मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री …

Read More »

महाराष्ट्र प.बंगाल बनू पाहतोय का ? मुख्यमंत्री विरूध्द राज्यपाल संघर्ष अधिक पेटण्याची चिन्हे

मुंबई: विशेष प्रतिनिधी पश्चिम बंगाल मध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाच वर्षे लवकरच पूर्ण होत आहेत. मात्र त्या राज्याच्या राज्यपाल पदी जगदीप धंखार यांची नियुक्ती झाल्यापासून मुख्यमंत्री बॅनर्जी विरूध्द राज्यपाल असा सामाना सुरु असल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे. अगदी त्याच पध्दतीने महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होवून ६ …

Read More »

राज्य सरकार म्हणते, विमानाबरोबर आता दैनदिंन रेल्वे सेवाही सुरु होणार केंद्र सरकार टप्प्याटप्याने रेल्वे सेवा सुरु करणार असल्याचे राज्याची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील अर्थचक्राला गती देण्याच्या उद्देशाने आणि लॉकडाऊनमुळे थांबलेले जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र सरकारने देशांतर्गत विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर राज्यातंर्गत रेल्वे सेवाही टप्याटप्याने सुरु करण्याचा विचार केंद्र सरकारकडून करण्यात येत असल्याची माहिती राज्य सरकारने आज जाहीर केल्याने दैनदिन रेल्वेसेवा लवकरच सुरु होणार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र याबाबतची …

Read More »

वाईन शॉप्सवाले म्हणतात किमान ३ हजाराचे मद्यप्रेम दाखवा तरच मिळेल प्रेम दाखविण्याच्या पध्दतीमुळे तळीराम संतप्त

मुंबई: प्रतिनिधी मुंबई महानगरपालिकेने मद्यप्रेमींसाठी आणि राज्यातील महसूलातील भर वाढविण्यासाठी सोमवारपासून वाईन्स शॉप्स (मद्यविक्रीची दुकाने) सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र या दुकानदारांनी किमान ३ हजार रूपयांची खरेदी करत असाल तरच तुम्हाला मदीरा घेता येईल अशी अट घातल्याने मद्यप्रेमींना घातल्याने तळीरामांनाकडून प्रचंड संताप व्यक्त होत असून या दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी …

Read More »

देशात गंभीर आर्थिक मंदी, चौकटीबाहेर जावून खर्च करण्याची गरज काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा इशारा

कराड : प्रतिनिधी कोरोना  लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. लोकांना वेतन न मिळाल्यामुळे त्यांची क्रयशक्ती संपली आहे व बाजारपेठेत मागणी (demand) नष्ट झाली आहे. त्यामुळे पुरवठादारांच्या किंवा उद्योगांच्या मालाची विक्री (supply) होणे अवघड होणार आहे. जागतिक अर्थतज्ञांनी भारतामध्ये गंभीर आर्थिक मंदीचे भाकीत वर्तविले असून मागणी वाढावी यासाठी सरकारने चौकटी बाहेर …

Read More »

अंदमानातील तुरूंगवासानंतरचे वीर सावरकर, चार खंडातील पुस्तकांचे लवकरच प्रकाशन हिंदी भाषेत प्रकाशित होणार असल्याची बीमा मंडीचे संस्थापक प्रशांत करूलकर यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी स्वातंत्र्यावीर वि.दा.सावरकर यांच्या अंदमान येथील तुरुगांनंतरच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणाऱ्या हिंदी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन लवकरच होणार असून या पुस्तकाचे चार खंड प्रकाशित होणार आहेत. रत्नागिरी पर्व, हिंदू महासभा पर्व, अखंड हिंदूस्थान संघर्ष पर्व आणि अंतिम पर्व अशा चार खंडातील हिंदी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन सावरकरांच्या १३७ व्या जयंतीदिनी होणार असल्याची …

Read More »

३ हजार रूग्णांच्या विक्रमी संख्येसह राज्य पोहोचले ५० हजारांवर तर अॅक्टीव केसेस अवघ्या ३३ हजार: ५८ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आजपर्यंतचे सर्वाधिक रूग्ण अर्थात ३ हजार ४१ रूग्ण राज्यात आढळून आले असून महाराष्ट्राने ५० हजार रूग्ण संख्येचा टप्पा पार केला. तर मुंबई शहराची संख्या ३० हजार ५४२ वर पोहोचली आहे. ५८ रूग्णांचा मृत्यू झाला तर ११९६ रूग्णांना घरी सोडून दिल्याने त्यांची संख्या १४ हजार ३०० वर …

Read More »

कर्जमुक्तीचा लाभ नाही मिळाला, खरीप हंगामासाठी कर्ज हवय..मिळणार बँकांना राज्य शासनाच्या सूचना देण्यात आल्याची सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या मात्र कोरोनाच्या संकटामुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या कर्जदार शेतकऱ्यांना खरीप कर्ज मिळणार आहे. याबाबत बँकांना सूचना देण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. यासंदर्भात राज्य शासनाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे. १ एप्रिल …

Read More »

शाररीक अंतर पाळत १५ जूनपासून शाळा सुरु? शिक्षण विभागाची तयारी तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे स्पष्ट संकेत

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. मात्र राज्यातील कोरोनाची संख्या तरीही वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनासोबत जगण्याचा भाग म्हणून रेड झोन वगळता राज्याच्या इतर भागातील शाळा १५ जून पासून सुरु करण्याचा विचार शालेय शिक्षण विभागाकडून गांभीर्याने करण्यात येत असल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे …

Read More »

कोरोनाग्रस्तांची संख्या वाढणार…पण अनेक गोष्टी पूर्वपदावर आणणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे इशारा आणि आश्वासन

मुंबई: प्रतिनिधी केंद्रीय पथकाने काही दिवसांपूर्वी मे अखेर पर्यत १ लाख २५ हजार ते दिड लाख रूग्णाच्या संख्येचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र आज मे महिन्याची २४ तारीख असून सद्यपरिस्थितीत ही संख्या ३३ हजार आहे. ही संख्या केवळ आपल्यामुळेच नियंत्रित ठेवण्यात यश आल्याचे सांगत आगामी दिवसात संख्या आणखी वाढणार असल्याचा …

Read More »