मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. सर्व उत्पन्नाचे मार्ग बंद आहेत. यामुळे राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सर्व विभागांनी नव्या योजना आणूच नये असे सांगत जितक्या म्हणून योजना आणि त्यावरील खर्च पुढे ढकलता येईल तितका पुढे ढकला असे सांगत कोणत्याही …
Read More »मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मे अखेर कोरोनामुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश
मुंबई: प्रतिनिधी अर्थचक्रही सुरु राहिले पाहिजे म्हणून आपण काही प्रमाणात झोन नुसार शिथिलता आणली, पण याचा अर्थ लॉकडाऊनमधून मोकळीक मिळाली असे नाही. विभागीय आयुक्त ,जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त , पोलीस यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करून आपापले क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोन्स मध्ये कसे येतील ते पाहावे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुरूप …
Read More »आमदारांनो तुमच्या लक्षवेधी, तारांकित प्रश्न पाठवा, पण ऑनलाईन विधानमंडळाकडून अधिवेशनासाठी सदस्यांना पत्र
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचे संकट असले तरी विधिमंडळाकडून कायदेशीर गोष्टींची पूर्तता करण्यासाठी तसेच आगामी पावसाळी अधिवेशन तयारीचा भाग म्हणून विधान परिषदच्या आमदारांना तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना आदी गोष्टी विधानमंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने पाठविण्याची विनंती केली. तसेच ही प्रश्न, लक्षवेधी ११ मे रोजी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यतच पाठविण्यास सांगितले. महाराष्ट्र विधानपरिषद …
Read More »अजून थोडे दिवस कळ काढा, जाता येईल शेजारच्या जिल्ह्यात कंटेन्मेंटमधील प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा बंदच राहणार
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोवीड विषाणूचा प्रादुर्भाव कमी होण्याकरिता उपाययोजना करण्यात येत असताना हळूहळू आर्थिक व्यवहाराला चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेड झोन आणि कंटेन्टमेंट झोनमधील बाधितांची संख्या कमी करण्यावर भर देणे आवश्यक असल्यामुळे आंतर जिल्हा प्रवासावर अजूनही निर्बंध आहेत, जिल्ह्यांच्या सीमा अजून काही काळ बंदच राहणार असल्याचे आज राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले. …
Read More »या महिन्यातही धान्य घेताना अंगठा लावायचा नाही अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी कोविड 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेशन दुकानातून अन्न धान्याचे वाटप करतांना सुरू असलेली ई पॉस प्रणाली मार्च आणि एप्रिल मध्ये शिथिल करण्यात आली होती. मात्र केंद्र सरकारच्या वतीने नव्याने ई पॉस प्रणाली पुन्हा सुरू करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. मात्र राज्यात अद्याप अनेक जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज क्षेत्र …
Read More »सामान्य प्रशासनाच्या आदेशाला “गुच्छ” मुळे महसूलकडून केराची टोपली त्या अधिकाऱ्यांना रूजू न करून घेण्याचे आदेश गृहनिर्माण विभाग लवकरच काढणार
मुंबई : विशेष प्रतिनिधी म्हाडा आणि एसआरएमधील अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार या पदावरील व्यक्तीची प्रतिनियुक्ती करायची असेल तर गृहनिर्माण विभागाची मंजूर घेणे आवश्यकच करण्याचा निर्णय राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने दिला. तरीही महसूल विभागातील अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या “गुच्छ” मुळे सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवित दोन अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती महसूल विभागाने केल्याचा …
Read More »कोरोनाच्या अनुषंगाने राज्यातील ५१.०५ लाख लोकांचे सर्वेक्षण पूर्ण फक्त ९९७ कंटेनमेंट झोन क्रियाशील
मुंबई: प्रतिनिधी कोरोनाबाधीत रूग्णांच्या अनुषंगाने आतापर्यंत ५१.०५ लाख नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. सद्यपरिस्थितीत ११ हजाराहून अधिक सर्वेक्षण पथकांच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्यात आले असून ९९७ कंटेनमेंट झोन सक्रिय असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात आज ११५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात …
Read More »मद्य दुकाने सुरु करण्यावरून घोळ…अखेर सरकारकडून मद्यविक्रीस परवानगी उत्पादन शुल्क म्हणते बंद तर सरकार म्हणते सुरु राहणार
मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यातीत मार्गदर्शक तत्वे जाहीर करताना मद्य दुकानांवरून राज्य सरकारने घोळ घालण्यास सुरुवात केली आहे. एकाबाजूला मुंबई उपनगरातील सर्व जिल्ह्यात वाईन शॉप्स, बिअर बार बंदच राहणार असल्याचे परिपत्रक काढून जाहीर करण्यात आले. तर दुसऱ्याबाजूला राज्य सरकारकडून कंन्टोमेंट झोन वगळता इतर भागात वाईन शॉप्सची दुकाने सुरु …
Read More »राज्य उत्पादन शुल्क म्हणते १७ मे पर्यत सर्व वाईन शॉप्स, बार बंदच विभागाकडून आदेश जारी
मुंबई: प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्पा उद्या ४ मे पासून सुरु होत आहे. मात्र या तिसऱ्या टप्प्यात वाईन शॉप्स आणि बार पूर्वीप्रमाणेच बंद राहणार आहेत. तसेच या काळात दारूबंदी कायदा लागू करण्यात आलेला असून बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देत ही बंदी मुंबई उपनगरातील सर्व जिल्ह्यांना …
Read More »पंतप्रधान मोदीजी IFSC हे प्राधिकरण मुंबईतच ठेवा तर मुंबईचे महत्त्व कमी करुन आंतरराष्ट्रीय बदनामीदेखील होईल अशी शरद पवारांची भीती
मुंबई: प्रतिनिधी गुजरातमध्ये IFSC स्थलांतरित करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची आणि गुणवत्तेच्या आधारावर मुंबईतच हे प्राधिकरण स्थानांतरित करण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली. IFSC प्राधिकरण ही देशातील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमधील सर्व वित्तीय सेवांचे नियमन करण्यासाठी युनिफाइड एजन्सी असून मुंबई …
Read More »
Marathi e-Batmya