भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) २४ फेब्रुवारी रोजी घोषणा केली की, नागरी सहकारी बँकांनी (UCB) व्यक्तींसाठी गृहकर्जावरील त्यांचा एकूण कर्जाचा हिस्सा त्यांच्या एकूण कर्जाच्या आणि कर्जाच्या २५% पेक्षा जास्त नसावा याची खात्री करावी. नियामक देखरेख राखताना या कर्जदारांना अधिक कार्यात्मक स्वातंत्र्य प्रदान करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांनुसार, …
Read More »उच्च न्यायालयात मुबंई महापालिकेची माहिती, काँक्रिटीकरण करताना कमीतकमी वृक्षतोड मुंबईतील सगळ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरु
मुंबई ही मुसळधार पावसासाठी ओळखली जातो. पावसामुळेच मुंबईतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळणी होते आणि मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. या समस्येवर तोडगा म्हणून सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत असल्याचा दावा महानगरपालिकेने आपल्या या प्रकल्पाचे उच्च न्यायालयात समर्थन केला आहे. काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याला प्राधान्य देताना कमीतकमी वृक्षतोड …
Read More »अक्षय शिंदे चकमक प्रकरण; चकमकीसाठी जबाबदार पोलिसांना तूर्त दिलासा चकमकीच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्याला परिच्छेदाला ठाणे न्यायालयाची स्थगिती
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कथित चकमकीशी संबंधित दंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालातील पोलीस अधिकाऱ्यांच्या नावांच्या आणि कथित चकमकीच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या परिच्छेदाला ठाणे सत्र न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली. त्यामुळे, अक्षयच्या चकमकीसाठी जबाबदार ठरवलेल्या पोलिसांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. अक्षयच्या चकमकीचा चौकशी अहवाल दंडाधिकाऱ्यांनी २० जानेवारी रोजी उच्च न्यायालयात …
Read More »येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून “स्कूल बसेस” साठी नियमावली लागू करणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खाजगी स्कूल बसेस साठी येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार आहे . त्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली असून त्यांना पुढील एक महिन्यांमध्ये या संदर्भातला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, शेतकऱ्यांना आता वर्षाकाठी १५ हजारांचा सन्मान निधी ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ ३ हजार रुपये वाढविणार
केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे. राज्य शासनही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ ६ हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय ३ हजार रुपयांनी वाढविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, ८ मार्चला काँग्रेसची सद्भावना यात्रा नारायणगड, भगवानगड येथे सद्भभावनेसाठी साकडे घालून मस्साजोग येथून ८ मार्च रोजी पदयात्रेला सुरुवात
महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बस्वेश्वर, चक्रधर स्वामी या महापुरुषांचा व जगद्गुरु संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासह महान संतांच्या विचाराचा वारसा लाभलेला आहे. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राने कायमच देशाला दिशा दिलेली आहे. परंतु मागील …
Read More »शरद पवार यांची अजित पवार गटावर टीका, नैतिकता आणि त्यांचा संबध… वाटत नाही मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणीवरून केली टीका
मागील अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि भाजपा आमदार सुरेश धस यांच्याकडून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि कृषी विभागातील भ्रष्टाचार प्रकरणी सातत्याने राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मात्र आरोप सिद्ध झाल्यानंतर राजीनामा घेण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नैतिकत्या मिकेतून धनंजय …
Read More »आकाश फुंडकर यांचे आश्वासन, माथाडी संघटनांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक माथाडी कायदा रद्द होणार या अफवा
माथाडी कायद्यामुळे अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळाला असून या कायद्यामुळे माथाडी कामगारांचे जीवन सुकर झाले आहे. माथाडी कायदा एक चळवळ आहे. माथाडी कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संघटनांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक, असे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी व्यक्त सांगितले. सह्याद्री अथितीगृह येथील दालनात माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत माथडी कायदा बचाव कृती …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची आशा, ‘एआय’ आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल राज्यात डिजीटल सेवांचे प्रमाण वाढले
तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून राज्य शासनामार्फत प्रशासन व अर्थव्यवस्थेला गती देण्यात येत असून महाराष्ट्र राज्य लवकरच देशाच्या ‘एआय’ आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. हॉटेल ग्रॅंड हयात येथे नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप समिट कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नॅसकॉमचे श्रीकांत वेलामकन्नी …
Read More »शरद पवार यांची स्पष्टोक्ती, नीलम गोऱ्हे यांचे ते वक्तव्य मुर्खपणाचे, यायलाच पाहिजे नव्हते ठराविक कालवाधीतील पक्षांचा कालावधी पाहता असे वक्तव्य करायला नको होते
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत शिवसेना उबाठामध्ये पदांसाठी अप्रत्यक्ष भ्रष्टाचार होत असल्याचे टीका केली. त्यावरून शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर खोचक भाषेत टीका केली. तसेच साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार यांनी बोलावे असे आव्हानही केले होते. त्यानुसार राष्ट्रवादी …
Read More »
Marathi e-Batmya