राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांसाठी ४०६६ नव्या आधार किटचे वाटप १० फेब्रुवारी रोजी करण्यात येणार असल्याची माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री अँड. आशिष शेलार यांनी आज दिली आशिष शेलार यांनी पुढे बोलताना म्हणाले की, नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्ड नूतनीकरण करणे, पत्ता बदलणे, अशा विविध सेवा देणारी …
Read More »सुप्रिया सुळे यांचा इशारा, संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही कृष्णा आधळे कुठे आहे त्याचा तपास काय
महाराष्ट्रातील हप्तेबाजी, भ्रष्टाचार, खंडणी हे सगळं थांबलं पाहिजे यासाठी ताकदीने आम्ही सर्व लढणार असा निर्धार व्यक्त करत सोमनाथ सुर्यवंशी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा इशाराही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया …
Read More »नाना पटोले यांचा खोचक सल्ला, फडणवीसांनी वकिली करण्यापेक्षा मुख्यमंत्रीपदाला न्याय द्यावा अजित पवारांना शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू दिसत नाहीत का? पीकविमा घोटाळ्यावर खोटे बोलण्याची गरज काय?
भाजपा युती सत्तेवर आल्यापासून तीन पक्षात मलईसाठी मारामारी सुरु आहे. सरकारमध्ये गम्मत जम्मत सुरु असून दररोज एका मंत्र्यांवर गंभीर आरोप होत आहेत. हिवाळी अधिवेशनात बीड व परभणीतील घटनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे उत्तर दिले त्यातूनच चित्र स्पष्ट झाले. एखादा निष्णात वकील जसा आरोपीला वाचवण्याचे काम करतो तेच काम मुख्यमंत्री …
Read More »मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचा आरोप, निवडणूक आयोगाला भाजपावाल्यांचे कृत्य दिसत नाही
दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांनी गुरुवारी सांगितले की, दिल्ली पोलिसांचे अधिकारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दिल्लीतील कपूरथला येथील घरी छापा टाकण्यासाठी पोहोचले आहेत. “भाजपावाले दिवसाढवळ्या पैसे, चपला, चादरी वाटत आहेत – ते दिसत नाही. त्याऐवजी ते निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर छापा टाकायला जातात. व्वा भाजपा! दिल्लीची जनता ५ तारखेला उत्तर …
Read More »अतुल लोंढे यांचा सवाल, शाळकरी मुलांना अंडी व फळे देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत का? मध्यान्न भोजन योजनेतील अंडी व फळांसाठी सरकारनेच निधी द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरू
भाजपा युती सरकारने आता शाळकरी मुलांच्या आहारावरच गदा आणली आहे. मध्यान्न भोजन योजनेतून शाळकरी मुलांना आहारातून प्रोटीन मिळावे यासाठी अंडी व फळे दिली जात होती. परंतु भाजपा युती सरकारने आता अंडी व फळांना निधी देण्यास नकार देत शाळा व्यवस्थापनांनी स्वतः खाजगी देणगीदारांकडून पैसे उपलब्ध करावेत असा जीआर काढला आहे. सरकारचा …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी, … शालेय शिक्षण विभागाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा ३५ लाख विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नाही याची जबाबदारी कोणाची?
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आपल्याच पक्षाच्या माजी मंत्र्याने घेतलेले निर्णय रद्द करण्याची कृती हे उशिरा आलेले शहाणपण आहे. दीपक केसरकर यांनी शिक्षण मंत्री म्हणून घेतलेले निर्णय चुकीचे आणि विद्यार्थी विरोधी होते. केसरकरांनी ‘एक राज्य, एक गणवेश’ हा हट्ट कशासाठी धरला होता? कोणाच्या फायद्यासाठी? यामागील ‘अर्थपूर्ण’ कारण काय? असे सवाल …
Read More »माघी गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाचा महत्वाचा आदेश राज्य सरकारसह एमपीसीबी आणि सर्व महापालिकांना सीपीसीबीच्या नियमांचे कठोरपालन करण्याचे आदेश
अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या माघी गणेशेत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्ती घडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या वापरावर (पीओपी) बंदी घालण्याच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) सुधारित नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. सीपीसीबीच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पीओपी गणेशमूर्ती तयार करणे, विक्री करणे आणि विसर्जन करण्यास सीपीसीबीने बंदी घातली …
Read More »कॉर्पोरेट कर्जदारांचा डेटा मिळविण्यासाठी पॅन आवश्यक कर्जदारांची रिअल टाईम माहिती, कर्जाच्या नोंदी मिळण्यासाठी मदत
भारतीय दिवाळखोरी मंडळाने (IBBI) आता कॉर्पोरेट कर्जदारांची माहिती घेऊ इच्छिणाऱ्या वापरकर्त्यांची ओळख पडताळण्यासाठी पॅन किंवा इतर कोणत्याही अधिकृत कागदपत्रांचा वापर करण्यासाठी माहिती उपयुक्तता (IU) ला अनिवार्य केले आहे. दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता (IBC) अंतर्गत, IU ला कोणत्याही सीडीच्या कर्जाच्या नोंदी, ताळेबंद आणि रोख प्रवाह विवरणपत्र, मालमत्ता इत्यादींच्या माहितीचा इलेक्ट्रॉनिक डेटाबेस …
Read More »मूडीजचा अंदाज, २०२५ मध्येही भारतीय अर्थव्यवस्था धिमीच महागाई आणि मागणीत घट यामुळे अर्थव्यवस्था धिमी राहणार
भारताची अर्थव्यवस्था २०२५ मध्ये मंदीसाठी तयार आहे, प्रामुख्याने सततच्या चलनवाढीच्या दबावामुळे आणि देशांतर्गत मागणीत घट झाल्यामुळे, असे मूडीजने त्यांच्या ताज्या अहवालात म्हटले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) एका त्रिकोणी संकटात सापडली आहे, तिला वाढ, चलनवाढ आणि चलन स्थिरता संतुलित करण्याची आवश्यकता आहे. उच्च व्याजदर कायम राहिल्याने, वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांत …
Read More »आर्टीफिशियल इंटेलिजन्सची लढाई तीव्रः अलिबाबाची क्वेन उतरली बाजारात अलिबाबा उद्योगाने अचानक लॉन्च केले एआय
कृत्रिम बुद्धिमत्तेची अर्थात आर्टीफिशियल इंटेलिजन्सची शर्यत आता अधिक तीव्र झाली आहे. चिनी ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाने त्यांचे नवीनतम एआय मॉडेल, क्वेन २.५-मॅक्ससह मैदानात उतरले आहे, ज्यामुळे देशांतर्गत प्रतिस्पर्धी डीपसीक आणि जागतिक स्तरावरील दिग्गज कंपन्या ओपनएआय आणि मेटा यांच्याविरुद्ध तीव्र टक्कर होण्याची शक्यता आहे. चंद्राच्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अलिबाबाने केलेली अचानक …
Read More »
Marathi e-Batmya