शिवसेनेचे निवडणूक चिन्ह कोणाचे आणि कोणाची शिवसेना खरी या याचिकेवर नुकताच सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने निर्णय देत केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढील सुनावणी घेण्याचे आदेश दिले. मात्र उध्दव ठाकरे गटाकडून आणि एकनाथ शिंदे गटाकडून एकमेकांच्या विरोधात दाखल करण्यात तब्बल १५ याचिकांवर निर्णय कधी होणार याबाबतचा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. …
Read More »प्रकाश आंबेडकर म्हणाले, निवडणूक आयोगाला आपण Frankenstein करायला निघालो का? निवडणूक आयोग तटस्थता जपेल का?
राज्यातील शिवसेना कोणाची आणि शिवसेनेचे चिन्ह कोणाचे यावरून सर्वोच्च न्यायालयात अद्यापही सुनावणी आहे. मात्र काल बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाण कोणाचे याबाबतचा पुढील निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेण्यास परवानगी देणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर बोलताना वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शंका उपस्थित केली. …
Read More »जयंत पाटील म्हणाले, आयोगाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन निर्णय घेणे न्यायालयाला अपेक्षित सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर व्यक्त केली प्रतिक्रिया
दिवसभर सुनावणी पार पडल्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाच्या बेंचने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याचे नाकारले आहे. मात्र हा अंतिम निर्णय आहे असे वाटत नाही. आता निवडणूक आयोगाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन निर्णय घ्यावा हे सुप्रीम कोर्टाला अपेक्षित दिसते असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त …
Read More »ठाकरेंच्या याचिकांवर निर्णय घेण्याआधी सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला दिलासा देत दिला निकाल
राज्यातील सत्तासंघर्षावरील शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या गटाने दाखल केलेल्या एकाही याचिकेवर निर्णय देण्याआधी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने मागील सुनावणीवेळी एकनाथ शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज दिवसभर सुनावणी घेत शिंदे गटाला दिलासा देणारा निर्णय दिला. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उध्दव ठाकरे गटाकडून शिंदे यांच्यासह १६ जणांच्या अपात्रतेसह जवळपास चार याचिका …
Read More »न्यायालयात सुनावणी सुरु असताना उध्दव ठाकरे म्हणाले, कितीही अफजलखान आले तरी… ज्यांच्यासाठी खस्ता खाल्या ते खोक्यात गेले
राज्यातील शिवसेना कोणाची यावर आज सर्वोच्च न्यायालयात सकाळपासून सुनावणी सुरु आहे. उध्दव ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यावर पुढील सुनावणी घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. तर एकनाथ शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेचा याचिकांवर निकाल द्यावा मात्र शिवसेनेबाबतची सुनावणी निवडणूक आयोगाने घ्यायला परवानगी द्यावी यावरून मागणी …
Read More »मराठा आरक्षणासाठी भाजपा-शिंदे गटाच्या प्रत्येकी तीन जणांची मंत्रिमंडळ उपसमिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मान्यता
मुंबई उच्च न्यायालयात गेलेले मराठा समाजाचे आरक्षण परत मिळविण्यासाठी आता शिंदे-फडणवीस सरकारने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची आज स्थापना केली. या समितीत 6 मंत्ऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या उपसमितीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे या समितीत भाजपा आणि शिंदे गटाच्या …
Read More »सरन्यायाधीश लळीत यांच्या सत्कारावरून जयंत पाटील यांनी टोचले मुख्यमंत्र्यांचे कान सरकार वैधतेची गंभीर सुनावणी सुरु असताना सरन्यायाधीशांसोबत बसणे संकेतांना धरुन नाही
महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले यु.यु.लळीत हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पदी नियुक्ती झाल्याबद्दल सुरुवातीला राजभवनावर होणारा सत्कार सोहळा ऐनवेळी ताज हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला. मात्र या सत्कार सोहळ्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री आणि न्यायपालिकेच्या या वर्तनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्राच्या सुपुत्रांची नियुक्ती झाली. मात्र ते निवृत्त होण्यापूर्वी कोणाचा राज्य …
Read More »ठाकरे विरूध्द शिंदेः घटनापीठाने सांगितलं, २७ सप्टेंबरला सांगणार काय करायचे ते निवडणूक आयोगाच्या सुनावणीबाबत देणार निर्णय
राज्यातील शिवसेनेतील फुटीमुळे खरी शिवसेना कोणाची यावरून निर्माण झालेल्या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय घ्यायचा की नाही यासह सर्व याचिकांवरील निर्णय येत्या २७ सप्टेंबरला होणार आहे. आज झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायमुर्ती धनंजय चंद्रचुड यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचे न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड यांनी सांगत सुनावणी तहकूब केली. निवडणूक चिन्हासंदर्भात …
Read More »अखेर सरकारला फटकारत तीस्ता सेटलवाड यांना न्यायालयाकडून जामीन मग काय तुरुंगात ठेवावे का असा सर्वोच्च न्यायालयचा सवाल
गुजरात दंगलीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना न्यायालयाकडून क्लिन चीट मिळाली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या दंगलप्रकरणी काँग्रेसचे स्वर्गिय नेते अहमद पटेल यांच्याकडून पैसे घेवून तीस्ता सेटलवाड यांनी सरकार विरोधात कट कारस्थान रचल्याचा आरोप केला. त्यानंतर गुजरात एटीएसने तातडीने तीस्ता सेटलवाड यांच्या विरोधात गुन्हे दाखल करत मुंबईतून अटक केली. …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा आणखी एक मोठा निर्णयः गुजरात दंगलीचे १० खटले बंद नवे सरन्यायाधीश यु.यु.लळीत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाचा निर्णय
तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात २००२ साली झालेल्या गुजरात दंगलीशी संबधित राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दाखल केलेल्या याचिकेसह सर्व याचिकांवरील सुनावणी बंद करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे नवनिर्वाचित सरन्यायाधीश यु यु लळीत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने आज दिला. गुजरात दंगलीप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासह जवळपास दहा याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. तसेच त्यापूर्वी …
Read More »
Marathi e-Batmya