राजकारण

शरद पवार यांचा सवाल, कमी मते मिळवणाऱ्या पक्षाला ४१ तर ७२ लाख वाल्याला फक्त १० जागा विधानसभा निवडणुकीतील मतांबाबत व्यक्त केले आश्चर्य

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आज कोल्हापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन परिषदेतून विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना पहिल्यांदाच मतदानाच्या आकडेवरून शंका उपस्थित केली. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, उद्या मारकडवाडी येथे जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधणार आहे. निवडणुकीत …

Read More »

१७३ आमदारांनी घेतली ५ भाषांमध्ये घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ ७ जणांनी घेतली संस्कृतमध्ये, दोघांनी हिंदीत घेतली शपथ

राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनास आजपासून सुरु झाले. या अधिवेशनात पहिले दोन दिवस निवडूण आलेल्या सदस्यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज सत्ताधारी भाजपा आणि महायुतीतील असे मिळून १७३ आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी बहुतांश आमदारांनी मराठीत शपथ घेतली. तर काही जणांनी संस्कृत, उर्दू आणि हिंदी भाषेत …

Read More »

राज्यघटनेचे नाव घेणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधकांना घटनेच्या शिल्पकाराचाच विसर विधान भवन परिसरातील शिवाजी महाराजांना अभिवादन तर घटनेच्या शिल्पकाराकडे पाठ

मागील १५ वर्षापासून विशेषतः २०२४ च्या लोकसभा निवडणूकीपासून सातत्याने सत्ताधारी भाजपाचे नेते आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्वच घटक पक्षाकडून राज्यघटनेचा आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सातत्याने घेतले जात होते. त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीत तर प्रत्येक भाषणात आणि प्रत्येक वाक्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष …

Read More »

२ च दिवसात देवेंद्र फडणवीस यांना त्यांचे वक्तव्य आठवेना, आदित्य ठाकरे राहिले बघत आदित्य ठाकरे उभे राहिले, पण देवेंद्र फडणवीस यांनी केले पूर्ण दुर्लक्ष

राज्यात नव्याने स्थानपन्न झालेल्या महायुती सरकारचा शपथविधी ५ डिसेंबर रोजी झाला. त्यानंतर संध्याकाळी मंत्रालयात येऊन मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला. तसेच राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठकही घेतली. त्यानंतर मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्राची राजकिय संस्कृती वेगळी असून राज्यातील राजकिय परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी सर्वच राजकिय पक्षांनी भूमिका घ्यावी …

Read More »

मारकडवाडी प्रकरणाचे विधानसभेत पडसादः महायुतीच्या १७३ जणांनी घेतली शपथ महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधींचा सभात्याग

महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष हंगामी अधिवेशनाला ७ डिसेंबर या दिवशी प्रारंभ झाला. मात्र आज विधानसभेचे अधिवेशन सुरु होताच राज्यातील महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेत मारकडवाडी प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत ईव्हीएम विरोधी घोषणा देत शपथविधी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या ४९ सदस्यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली नाही. परंतु सत्ताधारी महायुतीतील भाजपा, शिवसेना …

Read More »

अबु आझमी आणि रईस शेख यांनी घेतली शपथः मविआतून बाहेर? उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे कारण पुढे करत दिले संकेत

राज्यातील महायुती सरकारला मिळालेल्या संशयातीत विजयाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी सत्ताधाऱ्यांवर मतदान चोर अशी टीका करत सत्ताधाऱ्यांबरोबर आमदारकीची शपथ घेण्याऐवजी उद्या रविवारी शपथ घेणार घेणार असल्याची घोषणा केली. मात्र महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी आणि आमदार रईस शेख यांनी सत्ताधाऱ्यांसोबत विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यामुळे समाजवादी …

Read More »

पहिल्यांदाच विधानसभेत आलेल्या हेमंत रासने यांना अजित पवार यांनी दाखविली जागा चूकून विरोधी बाकावर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत रासने नंतर मात्र सत्ताधारी बाकावर

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत अनेक नव्या चेहऱ्याच्या उमेदवारांना संधी मिळाली. त्यात पुण्यात काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांचा पराभव करून विजय मिळविलेले हेमंत रासने हे यंदाच्या निवडणूकीत विजयी झाले. हेमंत रासने हे वास्तविक पाहता भाजपाच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडूण आलेले. तसेच त्यांची विधानसभा सभागृहातही पहिल्यांदाच हजर राहिलेले. मात्र चुकून विधानसभेत मोकळ्या …

Read More »

अजित पवार यांचा पलटवार, ईव्हीएमचा विषय काढून महाविकास आघाडी रडीचा डाव खेळतेय आम्ही महाविकास आघाडीत काम केलेय

महायुतीला इतके मोठे बहुमत मिळाले आहे की आता ईव्हीएमचा विषय काढून महाविकास आघाडी रडीचा डाव खेळत आहे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर माध्यमांशी बोलताना केला. अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही महाविकास आघाडीमध्ये काम केले आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीनला दोष …

Read More »

नाना पटोले यांची टीका, मतदान चोर सरकारचा निषेध म्हणून सदस्यत्वाची शपथ न घेण्याचा मविआचा निर्णय बॅलेट पेपरवर मतदान ही मारकडवाडीत पडलेली ठिणगी देशभरात पोहचवण्याचा काँग्रेसचा संकल्प

विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात भाजपा युतीचे सरकार आले असले तरी आपल्या मतदानाने हे सरकार आलेले नाही अशीच भावना जनतेला वाटत आहे. जनतेच्या मतांचे हे सरकार नाही. मारकडवाडीच्या लोकांची जी भावना आहे तीच राज्यातील बहुतांश जनतेची भावना आहे. जनभावनेचा आदर करत महाविकास आघाडीतील विधानसभा सदस्यांनी आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती …

Read More »

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकिय निवासस्थान आता वर्षा बंगला, तर… मुख्यमंत्र्यांचे शासकिय निवासस्थान म्हणून सागर बंगला?

राज्यातील संशयातीत बहुमत मिळविणाऱ्या महायुती सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावरील असे मिळून तिघांचा शपथविधी नुकताच पार पडला. परंतु मागील अनेक दशकांपासून मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान म्हणून ओळखला जाणारा वर्षा बंगला मात्र यापुढे मुख्यमंत्र्यांचा बंगला नव्हे तर उपमुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून ओळखला जाणार असून विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री म्हणून रहात असलेला सागर बंगला मात्र …

Read More »