राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने एल्गार पुकारला असून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ‘शेतकरी संघर्ष न्याय यात्रा’ काढण्यात येणार आहे. सोमवारी ३० मार्च रोजी धाराशीव जिल्ह्यातील सुरतगाव ते तुळजापूर अशी पदयात्रा निघणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या संघर्ष यात्रेत पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, स्थानिक नेते, कार्यकर्ते व शेतकरी सहभागी होणार आहेत. …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचे भाकित, तर डजनभर मंत्री, दोन डजन अधिकारी जेलमध्ये मित्रपक्षातील सहका-यांनी फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी खरातकडून अघोरी पूजा केल्यानेच फडणवीसांकडून कारवाई
भोंदूबाबा अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिराला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने २०१८ साली १.५ कोटी रुपयांचा निधी दिला होता. फडणवीसांच्या कार्यालयात त्यावेळी कार्यरत असणारे व आता म्हाडाचे अधिकारी मिलिंद बोरीकर यांचेही या बाबाशी अत्यंत जवळकीचे संबंध आहेत, अशी माहिती मिळत आहे. अशोक खरात प्रकरणात सरकारने प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री आणि दोन …
Read More »डॉ पंकज भोयर यांची माहिती, दक्षिण मुंबईतील पुनर्विकास व गृहनिर्माण प्रकल्पांना गती दक्षिण मुंबईतील कामाठीपुरामधील पुनर्विकास व गृहनिर्माण प्रकल्पांना गती
दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा आणि उमरखाडी परिसरातील पुनर्विकास व गृहनिर्माण प्रकल्पांना गती देण्याबाबत राज्य शासन कटिबद्ध असून लवकरच कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल, अशी माहिती राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिली. विधानसभेत सदस्य अमिन पटेल यांनी याबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती. राज्यमंत्री डॉ पंकज भोयर म्हणाले की, कामाठीपुरा परिसरातील जुन्या, मोडकळीस आलेल्या आणि उपकरप्राप्त इमारतींचा समूह …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, कांदा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी दीर्घकालीन पर्याय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सचिव स्तरीय समितीने उपाययोजना करावी
दरवर्षी कांद्याचा प्रश्न राज्यात उपस्थित होत असतो. या प्रश्नावर कायम स्वरुपी तोडगा काढण्याची गरज आहे. सद्यस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी लागणार आहे. यासाठी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव आणि पणन विभागाचे सचिव यांची समिती स्थापन करण्यात येईल. या समितीने शेतकऱ्यांना तातडीने करता येणाऱ्या उपायोजना सुचवाव्यात, असे …
Read More »सहसचिव सुजाता शर्मा यांची स्पष्टोक्ती, पेट्रोल—डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ नाही अफवांवर विश्वास ठेवू नका
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या (MoPNG) सहसचिव सुजाता शर्मा यांनी बुधवारी (२५ मार्च २०२६) सांगितले की, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. “अफवांवर विश्वास ठेवू नका,” असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालया (MoPNG) ने म्हटले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, आजपर्यंत २६ राज्यांना २२,००० टन व्यावसायिक LPG (कमर्शियल …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत भोंदू अशोक खरात बाबत केलेले निवेदन खालीलप्रमाणे… अशोक खरात याची संपत्ती ४० कोटीची संपत्ती
भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर करण्यात येणाऱ्या कारवाईविषयी सविस्तर निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करताना म्हणाले की, अशोक खरातला कोणत्या पद्धतीने अटक झाली? या प्रकरणी पोलिसांनी कोणती खबरदारी घेतली? पीडित महिला खरात विरोधात तक्रार देण्यासाठी कशा पुढे आल्या? याविषयी विस्तृत माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,”अशोक खरातने दैवी शक्तीचा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, एमपीआयडी प्रकरणी जलद कारवाईसाठी कायद्यात बदल करणार आर्थिक फसवणूक प्रकरणांमधील आरोपीवर कडक कारवाई
आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमधील आरोपींवर कठोर कारवाई करताना जप्त मालमत्तांची विक्री करून ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत. यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण कायद्यात (एमपीआयडी) महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. सदस्य हेमंत ओगले यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एमपीआयडीअंतर्गत कारवाईची प्रक्रिया सध्या वेळखाऊ …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी, जाचक व क्रूर ‘तृतीयपंथी व्यक्ती सुधारणा विधेयक, २०२६ तात्काळ मागे घ्या नाहीतर संसदीय स्थायी समितीकडे पाठवा
‘तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) सुधारणा विधेयक, २०२६’ ला काँग्रेस पक्षाचा तीव्र आणि ठाम विरोध आहे. हा केवळ एका विधेयकाला विरोध नाही तर सरकारच्या विचारसरणीलाच विरोध आहे. स्वातंत्र्य आणि सन्मान सरकारने दिलेल्या देणग्या नाहीत तर जन्मजात आणि मूलभूत हक्क आहे पण सरकार देशाच्या नागरिकांना हानी पोहोचवणाऱ्या प्रत्येक प्राधिकरणाला आपल्या पायाखाली तुडवू इच्छित आहे. ‘तृतीयपंथी …
Read More »आशिष शेलार यांची माहिती, मुंबईत मराठीसाठी लवकरच स्वतंत्र चित्रनाट्यगृह उभारणार १६४ मराठी चित्रपटांना २४ कोटी १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य
दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत ऑक्टोबर २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत परीक्षण केलेल्या ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ श्रेणीतील ६५ चित्रपट आणि कोविड काळातील ९८ चित्रपटांना एकूण २४ कोटी १० लाख अर्थसहाय्य मंगळवारी वितरित करण्यात आले. त्यावेळी मुंबईत केवळ मराठीसाठी स्वतंत्र चित्रनाट्यगृह लवकरच उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, धर्मातरीत व्यक्तीला अनुसूचित जाती-जमातीचे संरक्षण नाहीच आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी असा निर्णय दिला की, हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्मात धर्मांतर करणारी व्यक्ती अनुसूचित जाती (SC) दर्जासाठी पात्र ठरू शकत नाही आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत संरक्षणाचा दावा करू शकत नाही. न्यायालयाने असाही निर्णय दिला की, केवळ हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माचे …
Read More »
Marathi e-Batmya