Editor

६ वेळा मरून जिवंत झालेल्या दाऊदबाबत केंद्राने काय ते एकदाचं सांगावे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या दोन दिवसांपासून भारतीय प्रसार माध्यमातून येत आहेत. भारत सरकारने यावर मौन बाळगले आहे. त्यामुळे संशयाचे वातावरण तयार झाले आहे. दाऊदचा खरेच मृत्यू झाला की तो जिवंत आहे हे केंद्र सरकारने एकदाचे ठरवून देशाच्या जनतेला सांगावे, अशी मागणी काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस …

Read More »

आज पुन्हा शंभरीपार मृत्यूची नोंद होत संख्या पोहोचली ३ हजाराच्या जवळ २७३९ नव्या रूग्णांचे निदान मुंबईची वाटचाल ५० हजाराकडे

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त मृतकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. काल १३९ रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्यानंतर आज पुन्हा १२० जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने आतापर्यतच्या मृतकांची संख्या २ हजार ९६९ वर पोहोचली आहे. एकट्या मुंबई महानगरात १९९३ जणांचे मृत्यू झाले आहे. आज २७३९ नव्या रूग्णांचे निदान झाले असून एकूण रूग्णांची …

Read More »

राज्य सरकारची परिस्थिती ‘केवळ पॉलिसी’ नाही, तर ‘अ‍ॅक्शन पॅरालिसिस’ची चक्रीवादळग्रस्तांना १०० कोटींची मदत तुटपुंजी: देवेंद्र फडणवीस

मुंबई: प्रतिनिधी आपण ज्या घोषणा करतो, त्याप्रमाणे ते करतो का, याचा राज्य सरकारकडून विचार होणे आवश्यक आहे. ८० टक्के खाटा अधिग्रहित करण्यात येणार असल्याचे केवळ सांगण्यात आले, पण रूग्णांना खाटा मिळत नाही, ही वास्तविकता आहे. राज्य सरकारची ‘पुनश्च हरिओम’ ही संकल्पना चांगली आणि ती आवश्यकच आहे. सुरूवातीला काही अडचणी येतील. …

Read More »

सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात कोरोना चाचणी येणार (स्वस्त) खासगी प्रयोगशाळेसाठी सात दिवसात दर होणार निश्चित

मुंबई : प्रतिनिधी सध्या खाजगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचणी करायची असल्यास ४ हजार ५०० रूपये मोजावे लागत आहेत. इतक्या महागड्या किंमतीमुळे अनेकजण ही चाचणी करून घेण्यास धजावत नाहीत. तसेच उपचारासाठीही पुढे येत नाहीत. त्यामुळे अखेर या कोरोना चाचणीचे नव्याने दर ठरविण्यासाठी राज्य सरकारने चार सदस्यांची नव्याने समिती स्थापन केली असून आगामी …

Read More »

खुशखबर ! कोरोनाग्रस्तांसाठी राज्य सरकार अमेरिकन ‘रेमडेसीवीर’ औषध खरेदी करणार इंजेक्शनच्या १० हजार व्हॉयल्स खरेदी करणार असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचारासाठी राज्य शासनाने ‘रेमडेसीवीर’ इंजेक्शनच्या १० हजार व्हॉयल्स घेण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. ‘रेमडेसीवीर’ हे इंजेक्शन अँण्टी व्हायरल आहे. ‘सार्स’ आजारासाठी वापरण्यात आलेले हे इंजेक्शन त्यावर उपयुक्त ठरल्याने कोरोनावरही ते उपयुक्त ठरू शकते असे जागतिक आरोग्य संघटनेने सुचविले आहे. कोरोनाच्या …

Read More »

कृषीमंत्री म्हणाले, फक्त ५ टक्के रक्कम भरा आणि फळबागेचा विमा काढा पुनर्रचित हवामान फळपीक विमा योजना राज्यात राबविण्यास मान्यता दिल्याची कृषीमंत्री भुसे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यात पुर्नरचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना सन २०२०-२१ ते २०२२-२३ या तीन वर्षांसाठी राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक केली आहे. या योजनेत सहभागासाठी शेतकरी ऑनलाईन नोंदणी करू शकतात. योजनेत सहभागासाठी एकूण विमा हप्त्याच्या केवळ ५ टक्के विमा …

Read More »

अजित पवार म्हणाले, उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा खासगी रुग्णालय समन्वयासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती

पुणे: प्रतिनिधी कोरोनासारख्या संकटकाळात काही खासगी हॉस्पीटलकडून हलगर्जीपणा होत असल्याची बाब गंभीर आहे. कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी, तसेच या रुग्णालयांशी समन्वयासाठी वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्यात यावा असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. पुणे येथील …

Read More »

राज्यात ४ वर्षात १४ खाणी सुरु होत १३ हजार जणांना मिळणार रोजगार आदासा येथे कोळसा खाणीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हस्ते शुमारंभ

मुंबई: प्रतिनिधी आगामी ४ वर्षांत महाराष्ट्रात १४ खाणी सुरु होत आहेत आणि त्यातील ३ याच वर्षी सुरु करण्याचे आपण ठरविले आहे. या खाणींमुळे ११ हजार ५०० कोटींची गुंतवणूक होईल आणि सुमारे १३ हजार लोकांना रोजगार मिळेल अशी माहिती यावेळी वेस्टर्न कोलफिल्डने दिली. नागपूर जवळील आदसा येथील कोळसा खाणीचे मुख्यमंत्री उध्दव …

Read More »

आदीवासी मुलांच्या लसीसाठी सिध्दीविनायक मंदीराकडून १० कोटी रूपये लसीकरण मोहिमेसाठी विशेष बाब म्हणून दिला निधी

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आदीवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली, नाशिक, पालघर, नंदूरबार आणि अमरावती जिल्ह्यातील आदीवासी बालकांचे न्युमोनियामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने या भागातील १ लाख ४० हजार २८७ बालकांना ४६२८८१ इतका अर्थात ४६ हजार न्युमोनियाचा प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. त्यासाठी सिध्दीविनायक मंदीर …

Read More »

मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी करणार आता वर्क फ्रॉम होम व्हॉट्स अप, ईमेल, एसएमएसचा वापर करून काम पूर्ण करण्याचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने शासकिय कार्यालयातील उपस्थितीवर नियंत्रण आणण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित कर्मचारी-अधिकाऱ्यांनी घरातच बसून शासकिय काम करण्यास राज्य सरकारने परवानगी देत त्यासाठी व्हॉट्सअप, ई-मेलचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली असून या दोन्हींच्या माध्यमातून कामे पूर्ण झाल्याची माहिती मोबाईल एसएमएसद्वारे संबधितांना करण्यास सांगण्यात आले असून यासंदर्भातील आदेश …

Read More »